विधानसभा निवडणुकीच्या आधीच आमदार अवताडे आणि माजी आमदार सुपुत्र भागीरथ भालके यांच्यामध्ये रंगणार शीत युद्ध..?
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार स्वर्गीय भारत नाना भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून अचानकपणे तेलंगणा नेतृत्वावर विश्वास ठेवत बी आर एस मध्ये प्रवेश केला. आषाढीच्या शुभ मुहूर्तावर फार मोठी जंगी सभा सुद्धा सरकवली या ठिकाणी घेण्यात आली. परंतु सध्याच्या काळामध्ये तेलंगणा विधानसभेची रणधुमाळी रंगली असून त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मंगळवेढ्याचे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना सुद्धा प्रचारासाठी प्राचारण करण्यात आल्यामुळे ते आल्यानंतर तेलंगणातील वास्तव पंढरीत आणि मंगळवेढ्यात मांडतील आणि पुन्हा एकदा या दोन्ही नेत्यांमध्ये शीत युद्ध होण्याची शक्यता असल्याचं राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.
.jpg)
No comments:
Post a Comment