राज्यात सध्या ब्लॅकमेलिंगच राजकारण सुरू; प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर हल्लाबोल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 10, 2023

राज्यात सध्या ब्लॅकमेलिंगच राजकारण सुरू; प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर हल्लाबोल

 राज्यात सध्या ब्लॅकमेलिंगच राजकारण सुरू; प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर हल्लाबोल

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरातील अक्कलकोट तालुक्यात जाहीर सभा घेतली. सभा घेण्यापूर्वी पत्रकार परिषद घेत अजित पवार आणि भाजपवर निशाणा साधला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अजित पवारांचे कौतुक करत तुम्ही योग्य जागेवर बसलात असे संबोधले होते. प्रकाश आंबेडकर यांनी यावर प्रतिक्रिया देत, अजित पवारांना तिहार जेलमध्ये जायचं नव्हतं म्हणून ते भाजपसोबत जाऊन बसले आहेत, अशी टीका केली.
राज्यात सध्या ब्लॅकमेलिंगच राजकारण सुरू आहे, असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. अजित पवारांबाबत शालिनी पाटील यांनी अतिशय बोलक आणि मार्मिक उत्तर दिलं आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सध्या देशात भीतीच राजकारण सुरू आहे. भारतीय जनतेने आजतागायत जवळपास साडेनऊ वर्षे भीतीदायक आयुष्य काढले आहे. आणखीन काही महिने सहन करा, असे प्रकाश आंबेडकर यांनी आवाहन केले आहे. देशभरात सत्ताधाऱ्यांकडून दंगली केल्या जात आहेत. राजस्थान, मणिपूर, हरियाणा येथे दंगली होत आहेत. महाराष्ट्र राज्यात देखील दंगली झाल्या असत्या. मी औरंगजेबाच्या कबरीला किंवा माजारीला भेट दिली नसती तर महाराष्ट्र राज्यात देखील दंगल झाली असती, असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील भाजप सरकारला डिवचले.
संभाजी भिडे प्रकरणावर हाय कोर्टाने निरीक्षण नोंदवले आहे. यावर प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य करण्यास टाळले. संभाजी भिडेंवर कारवाईसाठी कोर्टाचे काय जात आहे. कोर्ट कारवाई करणार नाही. राज्य सरकार कारवाई करते. गांधी प्रेमी जे कुणी तरी आहेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप आमदार, अजित पवार यांच्या घरासमोर जाऊन धरणे आंदोलन करा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. कोर्टात कशाला जाताय, सवय झाली आहे कोर्टात जायची. कोर्ट कारवाई करणार नाही. सरकार कारवाई करणार आहे. सरकारवर निशाणा साधा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. राज्यभर संभाजी भिडेंविरोधात संतापाची लाट उसळली आहे. कारवाईची मागणी केली जात आहे. त्यावर वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी खुलासा केला आहे. संभाजी भिडेंवर कारवाई होणार नाही. कारण देशाचा पंतप्रधानच संभाजी भिडेंच्या पाया पडत असेल तर कोण कारवाई करणार? असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages