आठवडी बाजार 30 एप्रिलपर्यंत बंद
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश
सोलापूर, दि.14: कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आठवडी
बाजार, जनावरांचे बाजार आणि मॉल्स 30 एप्रिल 2020 रोजी रात्री 12:00 पर्यंत बंद राहतील
असे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 34 आणि
महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (3) अन्वये हे आदेश आज जारी केले आहेत.

No comments:
Post a Comment