संग्रामनगर ग्रामपंचायतीने दिला सतर्क राहण्याचा इशारा
अकलूज (प्रतिनिधी) महाभयानक अशा कोरोना विषाणूने जगभरात तांडव घातला असून या पार्श्वभूमीवर संग्रामनगर गावच्या नागरिकांनी घाबरून न जाता प्राणघातक अशा आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून विशेष काळजी घ्यावी असे आवाहन संग्रामनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच राजवर्धनी माने- पाटील यांनी केले आहे.सध्या स्थितीत महाराष्ट्रातील पुणे या शहरात काही रुग्णांना या आजाराची लागण झालेली दिसून येत आहे. याकरिता संग्रामनगर अकलूज व परिसरातील नागरिकांचे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने संग्रामनगर अकलूज ग्रामपंचायतीचे वतीने कोरोना विषाणू आजाराची लक्षणे व सदर रोगावर करावयाची उपाययोजना याबाबतचे माहितीपत्रक संपूर्ण संग्रामनगर अकलूज गावात होम टू होम वाटप करण्यात आले आहे. तसेच शहरातील प्रत्येक मुख्य चौकाच्या ठिकाणी डिजिटल बोर्ड लावून कोरोना आजारा बाबत व त्याच्या अनुषंगाने हातांची स्वच्छता राखणे बाबत व नागरिकांनी करावयाची उपाययोजना याबाबत आव्हान करण्यात आले आहे. तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना सँनिटायझरचे वाटप करण्यात आले आहे. तेव्हा सध्यास्थितीत संग्रामनगर अकलूज व परिसरातील नागरिकांनी घाबरून न जाता या रोगाचा प्रसार होऊ नये याकरिता वेळीच उपाययोजना करण्यात यावी. व लगेच वैद्यकीय सल्ला घ्यावा. कोरोना या विषाणू आजाराचा प्रादुर्भाव संग्रामनगर अकलूज व परिसरात होऊ नये याकरता आपले सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे असे आव्हान या वेळेस सरपंच राजवर्धनी श्रीराज माने पाटील यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment