स्वामी भक्तीच्या प्रबोधनातून भक्त स्वावलंबी बनत आहेत : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त) :- “*भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे*” हा श्री स्वामी समर्थांचा अभयमंत्र आजही लाखो भक्तांच्या जीवनाला प्रेरणा देत आहे. श्री स्वामी समर्थांनी भक्ती, सेवा आणि समाजप्रबोधनाच्या माध्यमातून दिलेला संदेश समाजासाठी कल्याणकारी असून, या प्रबोधनातून स्वामी भक्त स्वावलंबी बनत आहेत, असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री **बाबासाहेब पाटील** यांनी केले.
वे येथील **श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिराला** नुकतीच भेट देऊन सहकार मंत्री पाटील यांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन तथा नगरसेवक **महेश इंगळे** यांनी श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद व प्रतिमा देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला.
सत्काराला उत्तर देताना सहकार मंत्री पाटील म्हणाले की, श्री स्वामी समर्थांचा विचार हा केवळ अध्यात्मापुरता मर्यादित नसून तो समाजातील सकारात्मक परिवर्तनाचा मार्ग आहे. स्वामींच्या शिकवणीतून श्रद्धा, सेवा, आत्मविश्वास आणि स्वावलंबनाचा संदेश मिळतो. त्यामुळे भक्तीबरोबरच समाजहिताची जाणीव निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी **प्रथमेश इंगळे, अक्कलकोटचे सहायक उपनिबंधक थंबोरे, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे, रुद्रय्या स्वामी, सिद्धेश्वर कुंभार, प्रसन्न हत्ते, संदीप पंडित, श्रीशैल गवंडी, विपूल जाधव, प्रसाद सोनार, आदित्य पाटील, सोमशेखर अरबाळे, रवी वाघमोडे, संतोष पवार, श्रीकांत मलवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

No comments:
Post a Comment