Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरग्रस्त गावात स्वच्छता मोहिमेने घेतला वेग,

 पुरग्रस्त गावात स्वच्छता मोहिमेने घेतला वेग,




नोडल अधिकारी गावात तळ ठोकून ..!

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा परिषदेने पुढाकार घेत सिना व भीमा नदी काठच्या ८० गावांत स्वच्छता मोहिमेने वेग घेतला आहे.   जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी  स्वच्छता मोहिम गतीमान केली आहे. 
    आज तिर्हे व पाथरी येथे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनोल जाधव यांनी  पुरग्रस्त भागात भेट देऊन युध्दपातळीवर सुरू असलेले स्वच्छता मोहिमेची पाहणी करून सुचना दिल्या. तिर्हे येथे पुराचे पाणी शाळा व अंगणवाडी तसेच सार्वजनिक इमारती मध्ये शिरल्यामुळे त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. तसेच मंदिरीत देखील गाश साचला आहे. टॅंकर द्वारे पाण्याचे फवारे मारून स्वच्छचा करणेत आली. प्राथमिक आरोग्य केंद्रात देखील गाळ साचला आहे. 

आज सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी  उंदरगाव येथे भेट देऊन ग्रामस्वच्छता अभियानात सहभाग घेतला. स्वतः प्लास्टिक कचरा वेचत त्यांनी ग्रामस्थांनी प्रेरणा दिली. जिल्हा प्रशासन , ग्रामपंचायत व स्थानिक नागरिकांच्या सहभागातून जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये स्वच्छता मोहीम व त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामग्री पुरवली जात आहे. पूरग्रस्त  कुटुंबीयांच्या परिसरात त्यांनी स्वच्छतेची कामे स्वतःहून करून नागरिकांना धीर दिला. अशा गंभीर संकट काळात शासन सर्वतोपरी मदतीसाठी सोबत असल्याचे आश्वासन सिईओ कुलदीप जंगम यांनी दिले आहे. 

आज प्रकल्प संचालक अमोल जाधव यांनी तिर्हे, पाथरी गावात पायी चालत सर्व सार्वजनिक शासकीय इमारतींची पाहणी केली. सोबत जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, संवाद सल्लागार सचिन सोनवणे उपस्थित होते. पाथरी येथे नव्याने बांधल्या प्रशस्त आरोग्य केंद्रास देखील पुराचे पाण्याचा फटका बसला आहे. या ठिकाणची सरिव स्वच्छता करणेत येत आहे.  सार्वजनिक इमारती बरोबर पुराचा फटका बसलेले ग्रामस्थांचे घरात देखील निर्जतूकरण करणेचे सुचना प्रकल्प संचालक अमोल जाधव यांनी दिले आहेत. 
तिर्हे येथील स्मशानभुमीतील गाळ आज जेसेबी चे साहय्याने हटविणेत आला आहे. त्या ठिकाण ची पाहणी जाधव यांनी करून पुर्ण गावात स्वच्छता मोहिम राबविणेचे सुचना दिले आहेत. 

*गाळ काढून निर्जतूकिरण करा- प्रकल्प संचालक अमोल जाधव*
………..
गावात नाम फाऊंडेशन तसेच सर्व शासकीय यंत्रणा राबविणेत येत आहे.  अंगणवाडी केंद्र, आरोग्य केंद्र, मंदिरातील गाळ काढून तिया ठिकाणी निर्जतुकीकरण करी अशा सुचना प्रकल्प संचालक अमोल जाधव यांनी दिल्या.
Reactions

Post a Comment

0 Comments