सोलापूर शहरातील सिटी बस सेवा सुरू करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे महानगरपालिकेत निदर्शने
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- गेल्या पाच सहा वर्षापासून सोलापूर महानगरपालिका परिवहन सेवा वाढत्या भ्रष्टाचारामुळे लोकप्रतिनिधी व महानगर पालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे कात टाकण्याचा मार्गावर आह सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी सिटी बस सेवा तात्काळ सुरू करण्यात यावी याबाबत संभाजी ब्रिगेडच्या वतीने महानगरपालिके त निदर्शने करून प्लास्टिकची बस आयुक्तांना भेट देण्यासाठी आणली होती पण हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन उपायुक्त मुलांनी यांनी दिल्यामुळे त्याबाबतचे निवेदन देण्यात आले. स्वातंत्र्यानंतर सोलापूर महापालिकेची परिवहन सेवा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर होती. सहाशे कामगार या सेवेत दिवस-रात्र काम करायचे. शहराला या परिवहन सेवेचा मोठा आधार होता. महानगरपालिका परिवहन सेवा ही सर्वसामान्यांना परवडेल अशी होती या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाकडे सोलापुरातील आमदार खासदार व पालकमंत्री यांनी साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे सोलापूर शहरांमध्ये विमान सेवा सुरू झाली त्याचप्रमाणे सिटी बस सेवा सुद्धा सुरू होणे हे अत्यंत गरजेचे आहे
शहरातील हद्दवाढ भागामध्ये लोकसंख्या वाढल्याने अनेक नवीन नगरे वसाहती स्थापन झाल्या तिथपर्यंत जाण्या येण्यासाठी सिटी बस ची सेवा कमी दरात परवडण्यासारखी होती खाजगी रिक्षाने जाण्या येण्यासाठी शंभर ते दीडशे रुपये खर्च करणे हे सर्वसामान्य नागरिकांना परवडण्यासारखे नाही पण नाईलाजास्तव नागरिकांना हा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. शासनाने सोलापूर परिवहन विभागासाठी 100 ई बसेस मंजूर केल्या आहेत पण सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने चार्जिंग सेंटर बस डेपो आधी पायाभूत सुविधा उपलब्ध करणे अत्यंत गरजेचे आहे आणि हे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. शासनाकडून नवीन ई बस प्राप्त झाल्यास त्याची देखभाल व निगा राखणे ही अत्यंत गरजेचे आहे नाहीतर सन २0१५ मध्ये केंद्र शासनाच्या योजनेतून अशोक लेलँड कंपनीकडून १४४ बस खरेदी करण्यात आल्या.
यातील ९९ जनबसच्या चेसी क्रॅक झाल्याने आरटीओने नोंदणी रद्द केली. या वादाबाबत लवादापुढे सुनावणी सुरू आहे. यातील 22बस सुरू आहेत. अशाप्रकारे परिवहनच्या ताफ्यात असलेल्या २0३ बसपैकी ९९ बसच्या चेसी क्रॅक, ६७ बस नादुरूस्त असल्याने केवळ 22 बस मार्गावर धावत आहेत तीच पूर्वीसारखी अवस्था होईल.
आयुक्त यांनी सोलापूर शहरातील नागरिकांच्या अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न स्वतः जातीने लक्ष घालून सोलापूर महानगरपालिका परिवहन सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करावी अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेड च्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मीनल दास, वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश कदम, शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, जिल्हा कार्याध्यक्ष लखन पारसे, जिल्हा सचिव दिलीप निंबाळकर, जिल्हा सचिव सिद्धाराम सवळे, शहर सचिव सतीश वावरे, शहर उपाध्यक्ष फिरोज सय्यद, शहर संघटक कुणाल धोत्रे, शहर उपाध्यक्ष संतोष सुरवसे, दिलीप भोसले.
0 Comments