Hot Posts

6/recent/ticker-posts

कृषी सहायक कामावर; पंचनामे, खरीप मोहिमेला वेग; 'संपामुळे हंगामाच्या तोंडावर विविध कामांचा खोळंबा'

 कृषी सहायक कामावर; पंचनामे, खरीप मोहिमेला वेग; 'संपामुळे हंगामाच्या तोंडावर विविध कामांचा खोळंबा'  



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- विविध मागण्यांसाठी कृषी सहायक संपावर गेल्याने ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर २२ दिवस कृषी कार्यालयाकडील विविध कामे खोळंबली होती. राज्य सरकारने मागण्या मान्य केल्यामुळे ते बुधवार (ता. २८) पासून कामावर रुजू झाले आहेत. त्यानंतर पूर्वमोसमी पावसाने झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यासह खरीप मोहिमेला वेग आला आहे.

प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील कृषी सहायक पाच मे पासून संपावर गेले होते. जिल्ह्यात ४२ मंडलांत ५०४ व मुख्यालयासह तालुका कार्यालयांत ३० असे एकूण ५३४ कृषी सहायक आहेत. त्यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाकडील कार्यालयीन कामकाजासह मंडल स्तरावरील कामकाज ठप्प झाले होते. खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर बीज उगवण क्षमता तपासणी, बीजप्रक्रिया मोहीम थंडावली.

विशेष म्हणजे याच काळात पूर्वमोसमी पावसाला सुरवात झाली. या पावसामुळे शेतीसह फळबागांचे मोठे नुकसान झाले. मात्र, जिल्ह्यात पंचनामे होऊ शकले नाहीत. पाऊस पडत राहिल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी सुरू केली. पण कृषी विभागाकडून मार्गदर्शन मिळणे दुरापास्त झाले होते. लांबलेला पाऊस आणि मिटलेला संप यामुळे शेतकऱ्यांची अडचण दूर झाली. बुधवारपासून कृषी सहायकांनी पंचनाम्यासह मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना बीज उगवण क्षमता तपासणी, बीजप्रक्रिया याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन सुरू केले आहे.

साडेतीन हजार हेक्टर पिकांचे नुकसान पूर्वमोसमी पावसाने जिल्ह्यात आंबा, केळी व पपई या फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात एकूण तीन हजार ७०० हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. अजून पंचनामे सुरू असून त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

संप मिटल्यानंतर जिल्ह्यातील कृषी सहायक कामावर रुजू झाले आहेत. पूर्वमोसमी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. त्याचा प्राथमिक अहवाल आला आहे. खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर प्रात्यक्षिकासह शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments