Hot Posts

6/recent/ticker-posts

डॉ. बाबासाहेबांचे विचार समाजासमोर येणे अभिमानास्पद - डॉ लक्ष्मीकांत दामा

 डॉ. बाबासाहेबांचे विचार समाजासमोर येणे अभिमानास्पद - डॉ लक्ष्मीकांत दामा




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सामाजिक, न्याय, समता आणि बंधुता या त्रिसूत्रीवर भारतीय समाज उभा असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजासमोर येणे ही अभिमानास्पद बाब असल्याचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ लक्ष्मीकांत दामा यांनी सांगितले.
    येथील छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज मध्ये विद्यार्थी विकास विभाग , पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन डॉ. दामा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी महापौर मनोहर सपाटे हे होते. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष विनायकराव पाटील,  सरचिटणीस प्रा. महेश माने सोलापूर विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. प्रभाकर कोळेकर डॉ. केदारनाथ काळवणे डॉ. संजय गायकवाड प्राचार्य डॉ. मधुकर पवार आधीची प्रमुख उपस्थिती होती प्रास्ताविक  डॉ. युवराज सुरवसे यांनी केले.  यावेळी सपाटे म्हणाले,  संविधानाच्या माध्यमातून सर्वांना एकत्रित आणण्याची काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केल्याचे सांगितले.
      प्राचार्य डॉ. मधुकर पवार प्रा. डॉ. युवराज सुरवसे यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक वैचारिक अधिष्ठान या ग्रंथाचे  राष्ट्रीय परिषदेत तीन खंड प्रकाशित करण्यात आले. 
      वालचंद महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. चंद्रकांत चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत या परिषदेचा समारोप झाला.
यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्र उभारणीत मोलाचे योगदान दिल्याचे सांगितले यावेळी डॉ. किशोर जोगदंड, डॉ. दशरथ रसाळ , विनोद आखाडे, सुजाता हावळे यांनी शोधनिबंधाचे वाचन केले. तर प्राध्यापक प्रा. डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी दुसऱ्या सत्रात बीजी भाषण करून लोकशाही बळकट करण्यासाठी आदर्श मूल्यांची अंमलबजावणी करण्याची गरज यावेळी व्यक्त केली या कार्यक्रमास प्राचार्य मंजुश्री पाटील, प्रा. सचिन गायकवाड सिनेट सदस्य तथा व्यवस्थापन परिषद सदस्य,  प्रा.डॉ. शीला स्वामी प्रा.डॉ शिवाजी वाघमोडे, प्रा.डॉ. विकास शिंदे, प्रा.डॉ.राणी मोटे, प्रा.डॉ. सज्जन पवार, प्रा. डॉ.विष्णू वाघमारे, प्रा. डॉ. धनंजय मोगले,  प्रा. डॉ मनोज कसबे,  प्रा. डॉ. दरेप्पा बताले, प्रा रेवण बैरुंणगीकर,  प्रा. डॉ. किशोर थोरे  प्रा. संतोष गवळी,  प्रा. डॉ. वाल्मीक कीर्तीकर ,  प्रा.डॉ. नागेश गायकवाड , प्रा. डॉ. अभिमन्यू ओहळ, दत्ता भोसले यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व  शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सोनाली गिरी व  प्रा. लक्ष्मी रेड्डी यांनी केले तर आभार प्रा. डॉ. अरुण सोनकांबळे यांनी मांडले.

Reactions

Post a Comment

0 Comments