महाराष्ट्रात 'ते' ७० लाख मतदार आले तरी कुठून?
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा लोकसभेत सवाल
मुबंई (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीपासून विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत ७० लाख नवीन मतदारांची नोंदणी झाली. शिर्डीमध्ये एका घराच्या पत्त्यावर ७ हजार मतदारांची नोंदणी करण्यात आली. हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येएवढे नवीन मतदान महाराष्ट्रात कुठून आले, याची शहानिशा होणे गरजेचे आहे, असे मत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना व्यक्त केले. काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील मतदारांची विस्तृत यादी मागितली आहे. मात्र, निवडणूक आयोग यादी देणार नाही, याची खात्री असल्याचेही ते म्हणाले.
0 Comments