दक्षिण' च्या प्रगतीसाठी आ. देशमुखांना पुन्हा संधी द्या
म्हणाले की, काँग्रेसने देशावर जवळपास ६० वर्ष राज्य केले पण शेतकर्यांना कधी १२ रुपये पाठवले नाहीत. भाजपाने पी.एम. किसान योजना राबवली. आता या योजनेत वाढ केली जाणार करून ती पंधरा हजार रुपये केले जाणार आहे. भाजप हा एकमेव पक्ष आहे,ज्यांनी बजेटमध्ये शेतकऱ्यांना न्याय दिला आहे. आ. सुभाष देशमुख म्हणाले की, मंद्रूप एमआयडीसी रद्द करण्यात त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा वाटा आहे. पण तरुणांच्या कल्याणासाठी मी एमआयडीसी उभी करणारच आहे. ३५ वर्षांपासून रखडलेल्या वडापूर बॅरेजला मंजुरी मिळवली आहे. त्यामुळे आगामी काळात मतदार संघात सिंचनाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. कुडलच्या श्री संगमेश्वर मंदिर परिसराच्या विकासासाठी १७३ कोटी रुपयांचा प्रस्ताव लवकरच मंजूर होणार आहे. तालुक्याच्या विकासासाठी जे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न करणार आहे. यावेळी शहराध्यक्ष नरेंद्र काळे, डॉ. हवीनाळे, मळसिद्ध मुगळे,जगन्नाथ गायकवाड,आप्पासाहेब श्रीनिवास करली,मोटे, गौरीशंकर मेंडगुदले, नामदेव पवार, आनंद बिराजदार, मळेवाडी काका,हनुमंतराव कुलकर्णी,निलिमा शितोळे, तालुका महिला आघाडी अध्यक्ष अश्विनी पाटील,वृषाली पवार यांचे सह मतदार संघातील महायुतीचे पदाधिकारी,सरपंच उपसरपंच उपस्थित होते. सूत्रसंचालन यतीन शहा यांनी केले.
0 Comments