Hot Posts

6/recent/ticker-posts

शिंदे, पवार, फडणवीसांना एकदा तेलंगणात पाठवा, विमानाची सोय मी करतो

 शिंदे, पवार, फडणवीसांना एकदा तेलंगणात पाठवा, विमानाची सोय मी करतो


 रेवंत रेड्डींचे पंतप्रधानांना ओपन चॅलेंज


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी रविवारी सायंकाळी सोलापुरात काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी हजेरी लावली होती. प्रचार सभेनंतर रेवंत रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ओपन चॅलेंज दिले आहे. शेतकऱ्यांसाठी तेलंगणा राज्य सरकारने काय काय विकास कामे केली आहेत, त्या विकासकामांची लिस्टच रेड्डींनी माध्यमांसमोर मांडली. तसेच आम्ही तेलंगणा राज्यातील जनतेसाठी सहा विकास योजना आणल्या आहेत. त्या विकास योजना पाहण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारमधील अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना पाठवावे. अडचण आल्यास विमानाची व्यवस्था मी करतो, असे रेवंत रेड्डींनी मोदींनी चॅलेंज दिले.

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विशेष प्रयत्न
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न केले आहेत. सोनिया गांधी यांच्याशी संवाद साधून आम्ही तेलंगाणा राज्यात सहा विशेष योजना आणल्या आहेत. शेतकरी आत्महत्या रोखण्यात तेलंगणा राज्य सरकारला यश आले आहे. या सहा योजना पाहण्यासाठी आम्ही पंतप्रधान यांना आवाहन करत आहे, महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारमधील एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना तेलंगाणा राज्यात पाठवून द्या. काही अडचणी आल्यास आम्ही विमान देखील पाठवून देतो. त्यांना तेलंगाणा राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणलेली विकास कामेही दाखवतो, असे रेवंत रेड्डी म्हणाले.

नांदेडातूनही सरकारवर हल्लाबोल
भोकरचे विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवारांच्या प्रचारसभेसाठी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी नांदेडमध्ये उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी आपल्या १८ मिनिटाच्या भाषणात १२ मिनिट अशोक चव्हाणांनाच लक्ष्य केले. 'काँग्रेसने चव्हाण यांना गल्ली ते दिल्ली मान सन्मान मिळवून दिला. तरी ही त्यांनी पक्षाशी गद्दारी केली. ज्या नांदेडकरांनी त्यांना नेता बनवले, त्यांनी पक्ष बदलून नांदेडचे नाव खराब केले आहे.' असे रेड्डी म्हणाले. तर 'महाराष्ट्राची निवडणूक ही गद्दारांना धडा शिकवण्यासाठीची निवडणूक आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोबत गद्दारी केली, एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेसोबत गद्दारी करून गुजरातचे गुलाम बनले. अजित पवार यांनी शरद पवारांसोबत गद्दारी करून गुजरातचे गुलाम झाले.' असे म्हणत रेवंत रेड्डींनी शिंदे पवारांवर देखील निशाणा साधला.
Reactions

Post a Comment

0 Comments