चार दिवसांचा वेळ देतो, आरक्षण द्या नाहीतर पाणी अन् सलाईनही बंद करणार ; जरांगे पाटलांचा सरकारला अल्टिमेटम - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, September 6, 2023

चार दिवसांचा वेळ देतो, आरक्षण द्या नाहीतर पाणी अन् सलाईनही बंद करणार ; जरांगे पाटलांचा सरकारला अल्टिमेटम

 चार दिवसांचा वेळ देतो, आरक्षण द्या नाहीतर पाणी अन् सलाईनही बंद

 करणार ; जरांगे पाटलांचा सरकारला अल्टिमेटम



जालना (कटूसत्य वृत्त):- मराठा आरणक्षाणासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत.मागण्या जाणून घेण्यासाठी सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली.मंत्री गिरीश महाजन, मंत्री संदीपान भुमरेंनी मनोज जरांगे पाटलांशी चर्चा केली.यावेळी चार दिवसात मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली.मागण्या पूर्ण करण्यासाठी जरांगे पाटलांनी सरकारला चार दिवसांचा वेळ दिला आहे.

राज्य सरकारमधील ३ मंत्री आणि माजी २ मंत्री मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करत होते. पण अखेरपर्यंत जरांगे पाटील यांनी नमती भूमिका न घेता मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावं, त्यासंबंधीचा जीआर आणा-मगच मी माझं उपोषण मागे घेतो, अशी भूमिका लावून धरली. त्यामुळे राज्य सरकारच्या शिष्टमंडळाला रिकाम्या हाती परतावे लागले. मी कोणत्याही परिस्थितीत माझ्या मराठा समाजाला फसवू शकत नाही. अनेक चांगल्या घरांमधील मराठा समाजाची मुले आत्महत्या करतायेत. अनेक सरकारी भरती तोंडावर आहेत. मराठ्यांच्या पोरांचं कल्याण होऊ द्यात. तुम्ही देवदूत व्हा, आरक्षण दिलं तर मराठवाड्यातील हा मराठा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल, पण तोपर्यंत माझं उपोषण मी मागे घेणार नाही, मला मुंबईला येण्याचा आग्रह धरू नका, असं जरांगे पाटलांनी सरकारी शिष्टमंडळाला निक्षून सांगितलं.

मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जालनाच्या अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या आंदोलकांचं उपोषण सुरू आहे. आंदोलनाचा आठ आठवा दिवस आहे. जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे, यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. आज सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाचं शिष्टमंडळ जरांगे पाटलांच्या भेटीसाठी आलं. यात स्वत: गिरीश महाजन, अतुल सावे आणि संदीपान भुमरे होते. शिष्टमंडळाने सुमारे तासभर जरांगे पाटलांशी चर्चा केली. परंतु शासनाच्या अध्यादेशाशिवाय मी मागे हटणार नाही, अशी भूमिका शेवटपर्यंत जरांगे यांनी घेतली. एखाद्या आंदोलनात सरकार कशी शिष्टाई करते, हे आज सगळ्यांनाच पाहायला मिळालं. कारण सरकारची मनधरणी आणि आंदोलकांची भूमिका माध्यमांनी आज थेट लाईव्ह दाखवली.

शासनाला एक महिने द्यायला जरांगे पाटलांचा नकार

मराठवाड्याच्या मराठा समाजाला ओबीसींच्या सगळ्या सवलती लागू केल्या आहेत. तुमच्या मागणीप्रमाणे शासनाला निर्णय घ्यायला आणखी एक महिन्यांचा कालावधी द्या. सरकार आरक्षणासाठी सकारात्मक आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी कालही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांची भूमिका राज्यातील जनतेला सांगितली आहे. तेव्हा आपण एक पाऊल मागे या आणि सरकारला एक महिना वेळ द्या, अशी विनंती महाजन यांनी केली. परंतु जरांगे पाटील यांनी त्यांची विनंती फेटाळून लावली.

मागील महिन्यात सरकारने वेळ मागितली होती. तेव्हा चार दिवसांच्या ऐवजी आठवडाभर वेळ दिला. पण सरकारने निर्णय घेतला नाही. आता मी तुम्हाला एक महिन्याचा वेळ देऊ शकत नाही. कारण शेवटी हा आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. समाजाचा रोष मी माझ्या अंगावर घेऊ शकत नाही. घरी कुटुंबाला सांगितलंय, आलो तर तुमचा नाही तर समाजाचा होईन... निघाली तर आरक्षणाची जल्लोषयात्रा निघेल नाहीतर माझी प्रेतयात्रा पण आता माघार नाही, असा आक्रमक पवित्रा जरांगे पाटलांनी शिष्टमंडळासमोर बोलून दाखवला. जरांगे पाटलांचा आक्रमक बाणा पाहून शिष्टमंडळाला हताशपणे परतावं लागलं.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages