बिबट्याला पकडण्यात वनविभागाचे गौडबंगाल ? ; पालकमंत्री व वनमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - अंगद देवकते

करमाळा (कटूसत्य. वृत्त.):- बिबट्याला पकडण्यात वनविभागाला आलेले अपयश पाहता यामागे काहीतरी गौडबंगाल असण्याची शक्यता नाकारता येत असून अनेक नागरिकांच्या मृत्यूची जबाबदारी स्वीकारून पालकमंत्री व वनमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे करमाळा तालुकाध्यक्ष अंगद देवकते यांनी केली आहे.
याबाबत बोलताना ते म्हणाले की करमाळा तालुक्यात गेली आठ दिवसापासून खेडोपाडी बिबट्याच्या दहशतीने घबराटीचे वातावरण आहे.वनविभागाने व पालकमंत्र्यांनी दोनच दिवसांत बिबट्याला गोळ्या घालू.जेरबंद करू असे आदेश माध्यमांशी बोलताना दिले. परंतु अद्याप ही बिबट्याला ना जेरबंद केले ना गोळी लागली.यामागे काहीतरी गौडबंगाल असण्याची शक्यता आहे.बिबट्या आजून एक जीवघेणा हल्ला करण्याची वाट वनविभाग पाहते काय ?
0 Comments