Ads

Ads Area

निष्क्रिय राज्य सरकारकडून अपेक्षा राहिल्या नाहीत - खा. रणजितसिंह निंबाळकर

निष्क्रिय राज्य सरकारकडून अपेक्षा राहिल्या नाहीत - खासदार रणजितसिंह निंबाळकर 

कोरोना रुग्णांचे आकडे सरकारने लपवले- राज्य सरकारवर केली गंभीर टीका



सांगोला (तालुका प्रतिनिधी): राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश आले आहे. यामुळे या निष्क्रिय राज्य सरकारकडून आमच्या अपेक्षा राहिल्या नाहीत अशी टीका खासदार निंबाळकर यांनी केली. उन्हाळ्यात निरा उजवा कॅनॉलला पाणी सोडले आहे. टेंभूच्या कामासाठी केंद्र सरकारने भरघोस निधी दिला असल्याने वेळेत कामे पूर्ण झाली. त्यामुळेच ऐन उन्हाळ्यात सांगोला तालुक्याला टेंभूचे मिळाले असल्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी सांगितले.
        सांगोला तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे मंगळवारी सांगोल्यात आले होते. त्यावेळी खासदार निंबाळकर बोलत होते. 
      यावेळी खासदार रणजितसिंह निंबाळकर म्हणाले, कोरोनाचा पार्श्वभूमीवर लहान मोठे व्यवसाय आर्थिक संकटात सापडला आहे. कर्जपुरवठा न करणाऱ्या बँकांवर कारवाई केली जाईल. शेतकऱ्यांचा, कष्टकरांचा सांगोला तालुका आहे. संकटात रुतलेली चाके बाहेर काढण्यासाठी येणाऱ्या काळात खासदार म्हणून मी प्रयत्न करणार आहे. राज्य शासनाने मदत म्हणून 20 रुपये सुध्दा दिले नाहीत. कोरोना रुग्णांचे आकडे सरकारने लपवले आहेत. 
       लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर फक्त बारा दिवसात निरा उजवा कॅनॉलचे हक्काचे पाणी परत आणले. सांगोला तालुक्याला पाणी मिळवून देण्यासाठी मी खंबीर आहे. आमचे पाणी पळवणाऱ्याचे पाणी कसे पळवायचे यासाठी मी लढा देणार असल्याचे सांगत खासदार निंबाळकर यांनी शरद पवार यांना अप्रत्यक्ष आव्हान दिले. 
       यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाच्या वर्षपूर्ती निमित्त विविध कामांच्या अहवाल वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, अमरसिंह नाईक निंबाळकर, जयकुमार शिंदे, नितीन कर्णे, जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, शिवाजीराव गायकवाड, नगरसेवक आनंदा माने, गजानन भाकरे, श्रीकांत देशमुख, शशिकांत देशमुख, अभिजित नलवडे, अनिल(बंडू) केदार, शिवाजी घेरडे, संभाजी आलदर, साहेबराव पाटील, जयंत केदार, विजय बाबर, पुण्यवंत खटकाळे, बाळासाहेब सावंत, संजय पाटणे, सूर्याजी खटकाळे, दत्तात्रय जाधव, संजय केदार, नवनाथ भोसले, आनंद फाटे, नवनाथ पवार, शीतल लादे, वैजयंती देशपांडे, तानाजी कांबळे, भारत धनवडे, विलास व्हनमाने, माणिक सकट, देवा कांबळे, श्रीनिवास क्षीरसागर, शक्तीकेंद्र प्रमुख, बूथप्रमुख यांच्या सह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close