नवी दिल्ली : चीन सरकारची वृत्तवाहिनी शिन्हुआ न्यूजच्या तीन पत्रकारांना भारताने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. व्हिसा कालावधी वाढवण्यास नकार देत भारत सरकारने तिघांना भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत.जुलै महिन्याच्या अखेरीस संबंधित चीनी पत्रकारांचा व्हिसा संपणार आहे. त्यामुळे तिघांनी आपल्या व्हिसाचा कालावधी वाढवण्याची मागणी सरकारकडे केली होती. मात्र पत्रकारांची ही मागणी केंद्राने नाकारली आहे.
शिन्हुआ न्यूजच्या दिल्ली ब्युरोचे प्रमुख वू कियांग आणि मुंबईतील पत्रकार तांग लू आणि मा कियांग या तिघांना हे आदेश देण्यात आले आहेत. 31 जुलैपर्यंत तिन्ही पत्रकारांना देश सोडण्यास सांगितलं आहे.
No comments:
Post a Comment