महापालिकेच्या शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, May 7, 2026

महापालिकेच्या शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार

 महापालिकेच्या शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार 





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महापालिकेने यंदा सरासरी १७ टक्के पटसंख्या वाढीचे उद्दिष्ट ठेवले असून ‘मिशन स्कॉलरशिप’च्या माध्यमातून शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाचा टक्का वाढविण्यावर विशेष भर देण्यात येईल. इयत्ता पहिलीसाठी उत्कृष्ट शिक्षकांची नेमणूक करून सप्टेंबर २०२६ अखेर सर्व विद्यार्थ्यांना वाचन, लेखन आणि संख्याज्ञान आत्मसात करून देण्याचा निर्धार व्यक्त करत शिक्षणाचा दर्जा उंचावणे, पटसंख्या वाढवणे आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे या उद्दिष्टांसह विविध महत्त्वपूर्ण निर्णय शिक्षकांच्या सहविचार सभेत घेण्यात आले.
               आगामी शैक्षणिक वर्षाच्या पूर्वतयारीसाठी महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या सर्व शिक्षकांची सहविचार सभा हरीभाई देवकरण प्रशाला येथील मुळे सभागृहात उत्साहात पार पडली.  या सभेस महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे नियंत्रण अधिकारी तथा मुख्य लेखा अधिकारी डॉ. रत्नराज जवळगेकर , प्रशासनाधिकारी मल्हारी माने यांनी मार्गदर्शन केले. पर्यवेक्षक मनीष बांगर , रजनी राऊळ, निलोफर सय्यद यांनी विविध शैक्षणिक विषयांचा आढावा घेतला. 
           मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी मल्हारी माने यांनी शिक्षकांचे प्रश्‍न वेळेत मार्गी लावून त्यांना चिंतामुक्त वातावरण देण्यावरही भर देण्यात येणार आहे. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी सन्मानित करून प्रोत्साहन दिले जाणार आहे, असे सांगितले. महापालिकेतील शिक्षकांची मंजूर पदसंख्या ७२२ वरून सध्या २२० पर्यंत घटल्याची बाबही यावेळी मांडण्यात आली.
           महापालिकेने यंदा सरासरी १७ टक्के पटसंख्या वाढीचे उद्दिष्ट ठेवले असून ‘मिशन स्कॉलरशिप’च्या माध्यमातून शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाचा टक्का वाढविण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. इयत्ता पहिलीसाठी उत्कृष्ट शिक्षकांची नेमणूक करून सप्टेंबर २०२६ अखेर सर्व विद्यार्थ्यांना वाचन, लेखन आणि संख्याज्ञान आत्मसात करून देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.‘निपुण महाराष्ट्र’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करत इयत्ता पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा मूलभूत शैक्षणिक पाया भक्कम करण्यावरही भर देण्यात येणार आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढ, पटसंख्या वाढ आणि मूलभूत कौशल्यांवर भर देत महापालिका शाळांना नवसंजीवनी देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
         या सहविचार सभेस महापालिकेतील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages