महापौर पदावरून वाद चिघळणार? राम जाधवांची मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
सोलापूर महानगरपालिकेवर तब्बल ३२ वर्षांनंतर मराठा समाजाला महापौर पदाची संधी मिळण्याची अपेक्षा होती. मात्र भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या पदावर ओबीसी प्रवर्गातील उमेदवाराची निवड करण्यात आल्याने मराठा समाजावर राजकीय अन्याय झाल्याची भावना व्यक्त होत आहे. आणि याच पार्श्वभूमीवर जाधव हे काही दिवसांपासून आक्रमक आंदोलन करत आहेत.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या वक्तव्यविरोधात राम जाधव यांनी दिलेली प्रतिक्रिया समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गेल्या ४५ दिवसांपासून विविध आंदोलनांद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तरीही ठोस निर्णय न झाल्याने नाराजी कायम आहे.
दरम्यान, सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर मराठा समाजाला संधी देऊन हा वाद शमवला जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र त्या ठिकाणीही मराठा समाजाच्या पदरी निराशाच पडल्याने असंतोष अधिकच वाढला असल्याची भूमिका जाधव यांनी प्रसारमाध्यमांसमोर मांडली.
या सर्व पार्श्वभूमीवर राम जाधव यांनी राज्यातील मराठा आंदोलकाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन सविस्तर माहिती दिली. या भेटीनंतर मराठा आंदोलनाला नव्या टप्प्यात नेण्याची शक्यता वर्तवली जात असून, सोलापुरातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
.png)
No comments:
Post a Comment