Hot Posts

6/recent/ticker-posts

फडणवीस-कोठे नेतृत्वावर‎ ठेवलेला‎ विश्वास‎ सार्थ ठरला;‎ प्रभाग २२‎ चा‎ विकास आता थांबणार‎ नाही

 फडणवीस-कोठे नेतृत्वावर‎ ठेवलेला‎ विश्वास‎ सार्थ ठरला;‎ प्रभाग २२‎ चा‎ विकास आता थांबणार‎ नाही


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर‎ शहराच्या विकासाच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस‎ यांनी‎ दिलेली ग्वाही‎ ही प्रभाग क्रमांक २२‎ मधील‎ नागरिकांसाठी मोठी आश्वासक बाब ठरली‎ आहे.‎ हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर झालेल्या जाहीर‎ सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी‎ रामवाडी, लिमयेवाडी, विजापूर‎ नाका आणि‎ प्राणीसंग्रहालय परिसरातील पायाभूत‎ सुविधा,‎ रस्ते, पाणीपुरवठा‎ आणि‎ नागरी‎ सुविधांसाठी‎ भरीव‎ निधी‎ उपलब्ध करून‎ देण्याचा‎ ठाम शब्द दिला.‎ या घोषणेमुळे प्रभाग‎ २२‎ मधील विकासाला नवे बळ मिळाले असून,‎ नागरिकांमध्ये‎ समाधानाची‎ भावना‎ निर्माण‎ झाली आहे.‎ या महत्त्वपूर्ण‎ निर्णयासाठी आमदार‎ देवेंद्र‎ कोठे यांच्या‎ माध्यमातून‎ सातत्याने पाठपुरावा‎ करणारे‎ भाजपाचे उमेदवार‎ किसन जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे‎ जाहीर आभार मानले. मुख्यमंत्री जे बोलतात ते करून‎ दाखवतात. देवेंद्र‎ फडणवीस‎ आणि‎ देवेंद्र‎ कोठे‎ यांच्या नेतृत्वावर‎ आम्ही‎ जो‎ विश्वास ठेवला होता, तो आज‎ पूर्णपणे सार्थ‎ ठरला‎ आहे. त्यामुळे आता प्रभाग‎ २२ चा‎ विकास थांबणार नाही, तर‎ वेगाने‎ पुढे जाणार आहे,‎ असे जाधव‎ म्हणाले. रामवाडी‎ व लिमयेवाडी‎ भागातील‎ रस्ते,‎ ड्रेनेज,‎ पाणीपुरवठा‎ तसेच विजापूर नाका परिसरातील‎ मूलभूत सुविधांच्या कामांना या निधीमुळे गती‎ मिळणार‎ आहे. विशेषतः रोज‎ पाणीपुरवठ्याची‎ घोषणा‎ ही नागरिकांसाठी‎ मोठा दिलासा ठरणार‎ असून,‎ अनेक वर्षांपासून प्रलंबित‎ असलेल्या‎ समस्यांवर‎ तोडगा निघणार‎ आहे.‎ महात्मा गांधी‎ प्राणीसंग्रहालयाचा स्वतंत्र विकास आराखडा तयार असून,‎ त्यासाठीही‎ आमदार‎ कोठे‎ यांच्या प्रयत्नांना‎ मुख्यमंत्री‎ फडणवीस‎ यांनी पाठबळ दिले‎ आहे.‎ केंद्रात व‎ राज्यात भाजपाची‎ सत्ता असताना, महापालिकेतही भाजपाची‎ सत्ता आल्यास‎ विकासकामे अधिक वेगाने‎ आणि पारदर्शकपणे‎ होतील,‎ असा‎ विश्वास यावेळी व्यक्त करण्यात‎ आला.‎ किसन‎ जाधव‎ यांनी सांगितले‎ की, निवडून आल्यानंतर उर्वरित राहिलेली सर्व‎ कामे प्राधान्याने पूर्ण केली‎ जातील आणि‎ प्रभागाच्या शेवटच्या टोकापर्यंत विकास‎ पोहोचवला जाईल. मुख्यमंत्री‎ फडणवीस‎ यांच्या‎ स्पष्ट‎ भूमिकेमुळे आणि आमदार देवेंद्र‎ कोठे यांच्या‎ प्रभावी‎ नेतृत्वामुळे प्रभाग‎ २२‎ च्या‎ नागरिकांना आता‎ विकासाबाबत‎ ठाम भरोसा‎ मिळाला आहे.‎ या निधीमुळे‎ परिसराचा‎ चेहरामोहरा बदलणार असून,‎ भाजपाच्या‎ माध्यमातूनच प्रभागाचा सर्वांगीण विकास‎ साधला जाईल,‎ असा ठाम‎ विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.‎
Reactions

Post a Comment

0 Comments