“पावस कविता” कार्यक्रमात रसिक झाले चिंब
मसाप पुणे आणि मनोरमा साहित्य मंडळीच्या वतीने झाला कार्यक्रम
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आडोसा घेतला अन् पाऊस नाते जोडून गेला, पाऊस आला मोठा छत्रीत मैत्री जोडून गेला... ही पावसावरील बहारदार कविता अध्यक्ष श्रीकांत मोरे यांनी सादर करत पावस कविता या कार्यक्रमाची सुरुवात केली.
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पश्चिम (मनोरमा) सोलापूर आणि मनोरमा साहित्य मंडळी, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने “पावस कविता” हा पावसावरील आधारित कवितांचा कार्यक्रम रविवारी सकाळी 11 वाजता उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी श्रीकांत मोरे (ज्येष्ठ साहित्यिक तथा अध्यक्ष मसाप पुणे शाखा पश्चिम सोलापूर) होते.
मनोरमा सांस्कृतिक भवन, बेन्नूर नगर येथे झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून मसापचे कार्यवाह तथा साहित्य पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष प्रा. राजशेखर शिंदे, सौ. शोभा मोरे (अध्यक्षा, मनोरमा सखी मंच, सोलापूर), सौ. अस्मिता गायकवाड, (कार्याध्यक्ष, मसाप पुणे शाखा प. सोलापूर), डॉ. ऋचा मोरे–पाटील, संतोष सुरवसे, (कार्यवाह मसाप पुणे शाखा प. सोलापूर), सौ. शिल्पा कुलकर्णी (कोषाध्यक्ष / सचिव) उपस्थित होते.
प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी सौ. अस्मिता गायकवाड यांनी मी तुला फुल मागितलं तू अख्खी बाग दिलीस तर वंदना कुलकर्णी यांनी पाऊस ही कविता तर तू पावसात भिजताना ही कविता मारुती कटकधोंड यांनी सादर केली. शोभना सागर यांनी पाऊस आठवणीचा तर संतोष सुरवसे यांनी पावसातली भेट ही कविता सादर केली. शारदा तालीकोटी यांनी ऋतुराया तर डॉ. ऋचा मोरे पाटील यांनी प्रेमाचा पाऊस माझे माहेर ही कविता सादर केली. गोविंद काळे यांनी धरण ही कविता तर कालीदास चवडेकर यांनी हर एक श्रावणात सरी येऊन निघून जायच्या ही कविता सादर केली. पुष्पा करे यांनी काय बोलू मी मनाला पावसाचे थेंब हृदयावर राज्य करीत आहे ही कविता तर दीपलक्ष्मी वडापूरकर यांनी आषाढाच्या मेघांमध्ये दिसते जीवनगाणे ही कविता तर संध्या हेब्बाळकर यांनी प्रेम अंकुर तुझ्या मन भिजल का माझं ही कविता सादर केली.
मोहोळच्या सुलोचना पाटील यांनी जलबिना मछली ही कविता तर विमलताई माळी यांनी मेघ आला वाऱ्याचा अश्व ढगांना झेपावत ही कविता सादर केली. रेखा मगर यांनी अवकाळी पाऊस ही कविता तर बागेश्री सराफ यांनी सोहळा मेघांचा क्षितिजांच्या मिलनाचा ही कविता सादर केली. मंगला परदेशी यांनी बालगीत सादर केले. मयुरेश कुलकर्णी यांनी आता तरी बोलाव दिसामागून दिस गेले ही कविता तर चंद्रकांत मागाडे यांनी पावशा ही कविता सादर केली. अजय भोसले यांनी आले ढग आकाशात ही कविता सादर केली. संतोष धमगुंडे यांनी आठवणीतला पाऊस, बालपणीचा पाऊस कविता सादर केली. अभिराम सराफ यांनी ग. दि. माडगूळकर यांची रचना आभाळाच्या हाती आता पाऊस पाडता ही कविता सादर केली.
सर्व कवी आणि कवयित्रींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत सौ. अस्मिता गायकवाड यांनी केले. प्रास्ताविक सौ. शोभा मोरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या भगरे - भोसले यांनी केले. अभिराम सराफ यांनी म्हटलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
0 Comments