कृषी संकल्प रथाचे गावोगाव फिरवून मार्गदर्शन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-29 मे 2025 पासून सुरू होणाऱ्या विकसित कृषी संकल्प अभियान द्वारे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र मोहोळ जिल्हा सोलापूर तसेच कृषी विभाग महाराष्ट्र शासन आत्मा सोलापूर व राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर आणि भारतीय भरडधान्य संशोधन संस्था सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील 90 गावांमध्ये दोन टीम द्वारे गावोगाव जाऊन नवनवीन तंत्रज्ञान त्यामध्ये बीबीएफ तंत्रज्ञान, तूर शेंडा खुडनी, सुपर केन नर्सरी, जलतारा, पशुसंवर्धन, माती परीक्षण या विविध विषया वर कृषी संकल्प रथ गावोगाव फिरवून मार्गदर्शन करण्यात आले. यामधील टीम बी मार्फत करकंब,बार्डी ता.पंढरपूर, जि. सोलापूर तसेच तुळशी ता. माढा जि. सोलापूर या गावांमध्ये भेट देण्यात आली. यामध्ये तानाजी वाळकुंडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डॉ. स्वाती कदम यांनी सुपर केन नर्सरी व बीबीएफ तंत्रज्ञान, डॉ. विशाल वैरागर यांनी जलतारा व दामिनी ॲप तसेच डॉ.बसवराज रायगुंड, राष्ट्रीय भरडधान्य संस्था सोलापूर यांनी विविध भरड धान्यांविषयी तसेच श्रीमती पिंकी रायगुंड यांनी राष्ट्रीय डाळिंब संशोधन सोलापूर यांनी विविध सोलापूर वाहनांविषयी शेतकऱ्यांना अवगत केले. या कार्यक्रमासाठी पंढरपूर तालुक्यातील करकंब गावी लांडगे उपविभागीय कृषी अधिकारी पंढरपूर,सूर्यकांत मोरे तालुका कृषी अधिकारी सुहास यादव, मंडळ कृषी अधिकारी पंढरपूर, शरदचंद्र पांढरे सरपंच, आनंद ढवळे, उपकृषी अधिकारी पंढरपूर, योगेश पवार तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक पंढरपूर उपस्थित होते. बार्डी या गावी सरपंच खंदारे साहेब, उपसरपंच अभिजीत कवडे तसेच राहुल डोके उपकृषी अधिकारी उपस्थित होते. माढा तालुक्यातील तुलसी गावातील सरपंच डॉ.शरद किसन मोरे, दिगंबर बळीराम माळी उपसरपंच व सोमनाथ देवाळकर, उपकृषी अधिकारी, तुळशी येथील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले
चौकट
सारोळे येथे शास्त्रज्ञ सुसंवाद भेट..
महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत असणाऱ्या कृषी विज्ञान केंद्र तसेच राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्र सोलापूर यांनी संयुक्त भेट देऊन श्री कामराज चव्हाण येथील शेतकऱ्यांच्या डाळिंब बागेची पाहणी केली.पाहणी केली असता डॉक्टर पिंकी रायगुंड शास्त्रज्ञ, सध्या परिस्थितीमध्ये येणाऱ्या तेल्या व मुळकुजव्या रोगाच्या व्यवस्थापनाविषयी चर्चा करण्यात आली त्याचप्रमाणे येणाऱ्या वातावरणातील बदलाला डाळिंब बागेची निगा कशी राखायची यासंदर्भात शेतकऱ्यांना उदबोधित करण्यात आले तसेच डाळिंब पीक संदर्भातील अडचणी जाणून घेतल्या त्या संदर्भात मार्गदर्शन केले व सध्या चालू असलेल्या कृषी संकल्प रथयात्रेच्या अनुषंगाने बीज प्रक्रिया व उगवण क्षमता चाचणी यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments