Hot Posts

6/recent/ticker-posts

ताराराणींनी औरंग्याच्या खातमा अहमदनगरमध्ये (अहिल्यानगर) केला

 ताराराणींनी औरंग्याच्या खातमा अहमदनगरमध्ये (अहिल्यानगर) केला

छत्रपतींच्या घराण्याचा खरा इतिहास आजही काही मंडळी लपवितात


मोहोळ (कटूसत्य वृत्त):- छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी ताराराणी स्वतः घोडदौड करून, कधी तलवारीच्या बळावर तर कधी मुत्सदी बोलणी करून एक-एक करीत किल्ले जिंकू लागल्या. एक स्त्री युद्धात आपल्याला भारी पडते, हा विचार नव्वद वयाच्या जवळ आलेल्या औरंगजेबला असह्य होऊ लागला. त्यातून त्याच्याकडून अधिक चुका होऊ लागल्या. त्यात २५ वर्षे आपले घर-दार सोडून आलेले मुघल सैन्यही वैतागले होते. त्यातच माणमध्ये आलेल्या महापुरात घोडे, खजिना आणि मुघल सैनिक मोठ्या संख्येने वाहून गेले. बादशहा औरंगजेबही लंगडा झाला होता. हा मोका साधून ताराराणी आणि त्यांच्या शूर मावळ्यांनी गालितगात्र झालेल्या औरंगजेबचा ताणून ताणून खातमा अहमदनगरमध्ये (अहिल्यानगर) केला असल्याचे पुरावे अनेक इतिहास संशोधकांनी दाखविलेले आहेत. तरीही  काही मंडळी जाणीवपूर्वक छत्रपतींच्या घराण्याचा खरा इतिहास आजही लपविताना दिसत असल्याचं मत दै.कटूसत्यचे संपादक पांडुरंग सुरवसे यांनी व्यक्त केले.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतनिमित्त् शिवतेज शिवजन्मोत्सव तरुण मंडळ लांबोटी, ता.मोहोळ यांच्या वतीने आयोजित मिरवणुकीच्या उदघाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पांडुरंग सुरवसे बोलत होते. तर अध्यक्षस्थानी TV 9 चे लोकप्रिय पत्रकार व श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस सागर सुरवसे होते. 

याप्रसंगी छत्रपती राजाराम महाराजांचीही जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी विचारपीठावर जेष्ठ नेते, माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड, कट्टर शिवसेना नेते बाळासाहेब वाघमोडे, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत, कोंडी उपसरपंच शिवाजीराव निळ, शिवसेना युवा नेते शिवरत्न गायकवाड, स्वाभिमानी शेतकरी संघटनेत जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नाना मोरे, जय शंकर हॉटेलचे मालक गणेश खताळ, हॉटेल सुनीलचे मालक कुबेर बापू वाघमोडे, नाना होनमाने, अनिरुद्ध खताळ, प्रशांत ढवळे, दयानंद व्यवहारे, ज्ञानदेव देवकर, दादा हांडे, मोहन खताळ, बळी माने, सागर माने, लखन माने व शिवतेज शिवजन्मोत्सव मंडळचे विकास जाधव उपस्थित होते.

पुढे बोलताना पांडुरंग सुरवसे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याला सातत्याने बदनाम करून कमी लेखण्याचे काम सातत्याने एकाच जातीचे लोक करीत आहेत. त्यामुळे बहुजनांच्या मुलांनी हे लक्षात घेऊन नाचण्या पेक्षा आपल्या पूर्वजांचा खरा इतिहास वाचून खोटा इतिहास सांगणाऱ्यांना व लिहणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले पाहिजे. 

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव समिती अध्यक्ष श्रीधर चट्टे, उपाध्यक्ष भारत शिंदे, खजिनदार समाधान व्यवहारे, आधारस्तंभ विकास जाधव, संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत जाधव, डेकोरेशन वासुदेव चट्टे, मरप्पा जाधव, कुमार चट्टे, विष्णू चट्टे, अमर जाधव, महेश शिंदे, सचिन शिंदे, अरुण गायकवाड, संजय शिंदे, माऊली चट्टे, राम चट्टे, रामू चट्टे, गावकरी व समस्त शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments