Hot Posts

6/recent/ticker-posts

महाविकास आघाडी म्हणजे महाविनाश, महायुती म्हणजे विकास!

 महाविकास आघाडी म्हणजे महाविनाशमहायुती म्हणजे विकास!

दोंडाईचा येथील सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा हल्लाबोल




 मुंबई ( कटूसत्य वृत्त ) :-गांधी कुटुंबाच्या चार पिढ्या आल्या तरी अनुसूचित जाती जमाती आणि अन्य मागासवर्गीयांच्या आरक्षणात कपात करून मुस्लिमांना आरक्षण देण्याचा डाव यशस्वी होऊ दिला जाणार नाहीअसा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी दोंडाईचा (जि. धुळे) येथील प्रचंड जाहीर सभेत बोलताना दिला. महाराष्ट्रात मुस्लिमांना आरक्षण देण्याच्या उलेमा संघटनेच्या मागणीवर सहानुभूतीपूर्वक विचार करण्याच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आश्वासनावरून श्री. शाह यांनी काँग्रेस व महाविकास आघाडीला चांगलेच धारेवर धरले. महाविकास आघाडी म्हणजे विनाशआणि महायुती म्हणजे विकास हे स्पष्ट झाले असल्याने महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार पुन्हा सत्तेवर येणार आहेअसा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या सभेला व्यासपीठावर सरकारसाहेब रावलनयनकुंवर ताई रावलआ. अमरीशभाई पटेलडॉ. सुभाष भामरेभाजपा प्रदेश सरचिटणीस विजय चौधरीजिल्हाध्यक्ष बबनराव चौधरीमहायुतीचे उमेदवार राजवर्धन कदमबांडेसुभाष देवरेमहायुतीचे धुळे जिल्ह्यातील उमेदवार जयकुमार रावलकाशीराम पावराअनुप अग्रवाल आदी उपस्थित होते.   

श्री. शाह यांनी सांगितले कीयाच महाविकास आघाडीने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर करण्यास विरोध केलाअयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीस विरोध केला, 370 कलम  रद्द करण्यास विरोध केला आणि सर्जिकल स्ट्राईकलाही विरोध केला. वक्फ कायद्याच्या मनमानीमुळे देशातील जनता त्रस्त आहे. कर्नाटकात काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर तेथील परिस्थिती देश अनुभवत असून गावेच्या गावे वक्फ बोर्डाची मालमत्ता असल्याचा दावा केला जात आहे. शेकडो वर्षे जुनी मंदिरेशेतकऱ्यांच्या शेतजमिनी आणि लोकांची राहती घरेदेखील बघता बघता वक्फ बोर्डाच्या मालकीची झाली आहेत. आता महाआघाडीवाले वक्फ कायद्यात सुधारणा करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयासही विरोध करत आहेतत्यामुळे सावध रहा आणि काँग्रेस व आघाडीला सत्तेपासून दूर ठेवा असा इशाराही त्यांनी दिला. विनाश करणाऱ्यांच्या हाती राज्याची सत्ता द्यायची की विकासासाठी कटिबद्ध असलेल्या महायुतीकडे सत्ता द्यायची याचा निर्णय मतदारांनी करावयाचा आहेअसे ते म्हणाले.

केवळ अयोध्येतील राम मंदिरच नव्हेतर औरंगजेबाने तोडफोड केलेल्या काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे कामही मोदी सरकारने पूर्ण केलेआणि सोमनाथाचे मंदिरही आता पूर्वीच्या सुवर्णवैभवाने झळाळी घेत आहेहे काम भारतीय जनता पार्टीने केले आहे. येत्या तीन वर्षांत भारत ही जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल याची ग्वाहीदेखील शाह यांनी दिली. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती दिली असून केवळ सत्तेसाठी ते काँग्रेस आघाडीसोबत गेले आहेतअशी टीकाही त्यांनी केली. अलीकडेच उलेमाच्या एका संघटनेने काँग्रेसला निवेदन देऊन महाराष्ट्रात मुसलमानांकरिता दहा टक्के आरक्षण देण्याची मागणी केली आहे. याचा अर्थअगोदरच 50 टक्क्यांपर्यंत पोहोचलेल्या आरक्षणातून दलितअल्पसंख्य आणि आदिवासींच्या आरक्षणात कपात करून हे आरक्षण द्यावे लागेल. भारतीय जनता पार्टी विधानसभेत व संसदेत आहेतोवर हे आरक्षण मिळणार नाहीयाची ग्वाही त्यांनी दिली.

सोनिया गांधीमनमोहन सिंह यांच्या सत्ताकाळात पाकिस्तानातून दहशतवादी यायचे आणि बॉम्बस्फोट करून आरामात निघून जायचेतेव्हा सरकार स्वस्थ बसत होते. मोदी सत्तेवर आल्यानंतर उरी व पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी ठोस कारवाई केलीदहा दिवसांत पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. देशाच्या सुरक्षेला मोदी सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहेलांगूलचालनाच्या भावनेने पछाडलेल्या आघाडीवाल्यांनी मात्रदेशाच्या सुरक्षिततेलाच वेठीस धरले आहेअसे ते म्हणाले.

अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न काँग्रेसनेशरद पवारांनी सत्तर वर्षे लटकावत ठेवला. मोदींनी सत्तेवर येताच पाच वर्षांतच हा प्रश्न सोडविलामंदिरही उभारलेआणि यंदा साडेपाचशे वर्षांनंतर रामलल्लाने आपल्या भव्य मंदिरात दीपावलीचा उत्सव साजरा केला. महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्राचे हित करू शकत नाहीमोदी सरकार केंद्रात आणि महायुतीचे सरकार महाराष्ट्रात असेलतर महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचे राज्य बनविण्यापासून कोणीच रोखू शकणार नाहीअसा विश्वास व्यक्त करतानाच या निवडणुकीत या आघाडीचा सुपडा साफ होणार आहेअसे विश्वासपूर्ण भाकितही श्री. शाह यांनी वर्तविले.

Reactions

Post a Comment

0 Comments