ग्रामीण भागातील विकास कामाला महत्व देणार - सरपंच ऋतुराज सावंत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, November 14, 2024

ग्रामीण भागातील विकास कामाला महत्व देणार - सरपंच ऋतुराज सावंत

 ग्रामीण भागातील विकास कामाला महत्व देणार - सरपंच ऋतुराज सावंत 


पंढरपूर  (कटूसत्य वृत्त):-महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांच्यावर विश्वास दाखवून पंढरपूर तालुक्यातील कौठाळी येथील  इनामदार वस्ती  येथील शिवाजी नागटिळक यांच्यासह मुस्लिम समाजातील 100 युवक कार्यकर्त्यांनी महाविकाच्या आघाडीचे उमेदवार अनिल सावंत यांना जाहीरपणे पाठिंबा देत युवक नेते वाकवचे सरपंच ऋतुराज सावंत, रवी सावंत यांच्या उपस्थितीत जाहीर  प्रवेश केला 

शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करत आहोत. अनिल सावंत आमदार झाले की दुष्काळी भागात.महाविकास आघाडीने पंचसूत्री योजना राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये कृषी समृद्धी अंतर्गत शेतकऱ्यांना 3 लाखापर्यत कर्जमाफी देण्यात येणार आहे. तसेच नियमित कर्ज फेडीसाठी 50,000 रु प्रोत्साहनराज्यातील सर्व नागरिकांना मोफत औषध व कुटुंब रक्षण 25 लाखांपर्यंत आरोग्य विभागामार्फत  मोफत देण्यात येणार आह.अनिल सावंत यांना आमदार करून आपण विधानसभेत पाठवावे, आमदार झाल्यानंतर या मतदारसंघात एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही वाकाव  सरपंच ऋतुराज सावंत यांनी सांगितले 

 यावेळी , आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष एम पाटील,    कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते 


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages