पक्ष फुटला पण परंपरेत खंड नाही; पवार कुटुंब दिवाळी पाडवा एकत्रच साजरा करणार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 20, 2023

पक्ष फुटला पण परंपरेत खंड नाही; पवार कुटुंब दिवाळी पाडवा एकत्रच साजरा करणार

 पक्ष फुटला पण परंपरेत खंड नाही; पवार कुटुंब दिवाळी पाडवा एकत्रच

 साजरा करणार

बारामती  (कटूसत्य वृत्त):-  मागील अनेक वर्षांपासून पवार कुटुंबीय दिवाळी पाडवा सहकुटुंब एकत्रितपणे साजरा करतात. पाडव्याच्या दिवशी राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक नागरिक व विविध पक्षाचे नेते पवार कुटुंबीयांना शुभेच्छा देण्यासाठी व भेटण्यासाठी येत असतात. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पवार कुटुंब यंदाचा दिवाळी पाडवा कसा साजरा करणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली होती. याबाबत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे.

बारामतीतील गोविंद बाग हे केवळ पवार साहेबांचं निवासस्थान नसून तमाम महाराष्ट्रातील जनतेचे माहेराचं आणि अधिकाराचा, हक्काचं घर आहे. त्यामुळे गोविंद बाग हे वर्षातील ३६५ दिवस महाराष्ट्रासह देशभरातील जनतेसाठी सदैव खुले आहे. या घरावर जेवढा माझा हक्क आहे. त्याहून जास्त मायबाप जनतेचा आहे, असे सुळे यांनी सांगितले. पवार कुटुंबीय यंदाचा दिवाळी दसरा एकत्र साजरा करणार का, या प्रश्नावर बोलताना सुळे म्हणाल्या की, पवारांची दिवाळी कालही एकत्र होती आजही एकत्र आहे. उद्याही एकत्र राहील. आमच्यात राजकीय मतभेद जरूर निर्माण झाले आहेत. राजकीय मतभेद आणि कौटुंबिक बाबी ह्या वेगळ्या असतात. त्यामुळे कुटुंबातील नाती जबाबदाऱ्या कुणीही डावलू नये या मताची मी आहे. कारण आपण भारतीय सुसंस्कृत लोक आहोत. त्यामुळे या दोन गोष्टीत गल्लत करू नये, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आजपर्यंत एकत्रित दिसले नाहीत. मात्र एका शाळेच्या इमारतीचे उद्घाटन खासदार शरद पवार यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत दिनांक २२ रोजी संपन्न होत आहे. या कार्यक्रमात तिघं एकत्रित येतील का, आले तर ते नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावर सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कुठलीही फूट पडलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष देशाचे नेते शरद पवार आहेत. महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील आहेत. हे पहिले वास्तव्य आहे. आमच्यातील काही सहकारी एका वेगळ्या विचाराच्या पक्षासोबत काम करू इच्छितात तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. याबाबतची जी न्यायालयीन लढाई आहे. ती चालू आहे. विद्या प्रतिष्ठान ही एक संस्था आहे. याची स्थापना पवार साहेबांनी केली आहे. कुटुंब व सामाजिक जबाबदारी म्हणून या सामाजिक कार्यक्रमात आम्ही सर्व एकत्र गेले अनेक वर्ष काम करत असल्याचे सुळे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages