युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा नाशिक, जळगाव येथील दौरा तात्पुरता रद्द

शिव संवाद यात्रेचा तिसरा टप्पा पुढे ढकलण्यात आला आहे
मुंबई (नासिकेत पानसरे): शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या 'शिव संवाद' यात्रेचा तिसरा टप्पा ९ आणि १० ऑगस्ट रोजी जळगाव,मालेगाव, नाशिक आणि भिवंडी ग्रामीण येथे आयोजित करण्यात आला होता . परंतु हा दौरा रद्द करण्यात आला आहे . श्री आदित्य ठाकरे यांची प्रकृती खराब असल्यामुळे तिसरा टप्पा दौरा पुढे करण्यात येणारं आहे. त्यांची कोव्हिड चाचणी निगेटिव्ह आली आहे. मात्र हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे .
दरम्यान आदित्यजी ठाकरे यांनी जळगांव, मालेगांव, नाशिक, आणि भिवंडीकरांना दिलगिरी व्यक्त केली असून लवकरच दौऱ्याच्या नवीन तारखा जाहीर करण्यात येतील असे सांगितले आहे .
No comments:
Post a Comment