मोदींची पी. एम. किसान योजनाच बोगस- राजू शेट्टी
.png)
यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या मालाला आधारभूत किंमत मिळायला पाहिजे, सध्या 23 पिकांना आधारभूत किंमत जाहीर झाली आहे पण ऊस वगळता इतर पिकांना आधारभूत किंमत मिळत नाही तसेच फळे व भाजीपाला आणि दूध यांनाही जादा दर व दूध किंमत मिळावी अशी आपली मागणी आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यात देशभरातील ग्रामपंचायतीमध्ये असे ठराव करून राष्ट्रपतींची भेट घेणार आहे शेतीमालाला आधारभूत किंमत मिळावी याबाबत मी आग्रह करणार आहे असे राजू शेट्टी यांनी सांगितले.
राज्यभरात पी एम किसान योजनेच्या त्रुटीबाबत विचारले असता त्यांनी, मुळात मोदींची ही योजनाच बोगस असल्याचे टीका केली. कारण मी माजी लोकप्रतिनिधी आणि या योजनेस पात्र नसतानाही माझ्या खात्यावर दर चार महिन्याला दोन हजार रुपये पडतात याप्रकरणी तहसीलदारांना खात्यावरील रक्कम परत करण्याचा प्रयत्न केला तरीही रक्कम माझ्या खात्यावर येते म्हणून ही योजना बोगस असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.
No comments:
Post a Comment