तिर्थक्षेञ तुळजापूरात नवराञोत्सवात चोरुन येणाऱ्या व आणणा-यांवर कठोर कारवाई करणार -डी वाय एस पी टिपरसे

तुळजापूर क.वृ.:- श्रीतुळजाभवानीच्या शारदीयनवराञोत्सव कालावधीत देवी दर्शनार्थ भाविकांनी येवु नये यासाठी कडकोट सुरक्षा व्यवस्था केली असुन या उपर ही कुणी तिर्थक्षेञ तुळजापूरात प्रवेश केल्यास येणाऱ्यावर व त्यांना येथे आणण्यास मदत करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इषारा उपविभागीयपोलीसअधिकारी डाँ दिलीप टिपरसे यांनी गुरुवार दि15रोजी पञकार परिषदेत दिला .
श्रीतुळजाभवानी शारदीयनवराञोत्सव पार्श्वभूमीवर तिर्थक्षेञ तुळजापूरात करण्यात आलेल्या बंदोबस्ताची माहीती देताना उपविभागीयपोलीसअधिकारी डाँ दिलीप टिपरसे व पो नि हर्षवर्धन गवळी म्हणाले कि यंदा शारदीयनवराञोत्सव साठी तिहेरी बंदोबस्त कार्यान्वित केला आहे .
प्रथमता श्रीतुळजाभवानी मंदीरचा पन्नास मीटर परिसरात सर्वानाच प्रवेश बंद असणार आहे .यात सुवर्णश्वर गणपती आर्य चौक शुक्रवार पेठ भागाचा समावेश आहे दुसरा बंदोबस्त शंभर मीटर आवारात असुन यात छञपती शिवाजी चौक कमानवेस बोंबल्या चौक तिसरा बंदोबस्त शहर हद्दीवर म्हणजे बार्शी टी पाँईट हंगरगा तुळ ,लातूर ,उस्मानाबाद या तीन बायपास वर तैनात असणार आहे येथे स्थानिक लोकांना आधार कार्ड मतदान ओळखपञ दाखवल्यास त्या त्या गावात येजा करण्यास परवानगी असणार आहे. तसेच जिल्हा हद्दीवर ही त्या त्या पोलिस स्टेशनचा बंदोबस्त तैनात असणार असुन तामलवाडी इटकळ जळकोट पारगाव वडगाव देव येथे कार्यान्वित असणार आहे
येथुन वाहनांनी तिर्थक्षेञ तुळजापूर कडे प्रवेश करु दिला जाणार नाही यात त्यात्या गावातील लोकांनी यात नोकरदार मालवाहतुक व्यापारी दुध विक्रेते भाजीपाला विकणा-या वाहनाना सुट दिली आहे.त्यांनी ओळख पञ दाखविणे गरजेचे आहे.येथुन परवानगी शिवाय कुणालाही प्रवेश दिला जाणार कुणी आत गेल्यास त्याचावर व त्याला नेण्या-यावर गुन्हे दाखल केले जाणार असल्याचा इषारा यावेळी दिला.
घटस्थापना दिवसापासुन शहरातील जुने बसस्थानक बंद करण्यात येणार असुन बस मधुन येणाऱ्या जाणाऱ्या साठी लातूर रोडवरील बसस्थानक चालु असणार आहे ऐखादा भाविक एस टी ने आल्यास त्याला लगेच तेथुन त्याचा गावाकडे रवाना करण्यात येणार आहे शहर हद्दीत प्रवासी थांबा असणार नाही
तिर्थक्षेञ तुळजापूर शहरामधुन जाणाऱ्या वाहनांसाठी एस टी व स्थानिकांचे वाहने वगळता इतर वाहनांना प्रवेश बंद असणार आहे.तिर्थक्षेञ तुळजापूरातुन जाणारी वाहतूक बायपास मार्ग बाहेरच्या बाहेर वळविण्यात येणार आहे.घाटशिळ घाट रस्ता वाहनांसठी पूर्णता बंद असणार आहे
मंदीरात नवराञउत्सव विधीसाठी मर्यादित भाविकांना सोडण्यात येणार आहे.
व्हीआयपी व पोलिस सह अन्य खात्यातील अधिकारी कर्मचारी यांच्या नातेवाईकांना मंदीरात सोडले जाणार नाही .
तिर्थक्षेञ तुळजापूरात असणाऱ्या सुरक्षाव्यवस्थेचा ठिकाणी नागरिकांची गैरसोय होवू नये म्हणून स्थानिक पोलिस कर्मचारी तैनात केली जाणार आहेत .
या सुरक्षेव्यवस्थेसाठी अधिकारी वर्गासह दोन ऐस आर पी प्लाटन २९४पोलिस कर्मचारी ६००होमगार्ड सुसज्ज यंञणेसह कार्यान्वित असणार आहे.
पुजारी वर्गांनी आपआपल्या भाविकांना शारदीयनवराञोत्सवकालावधीत तिर्थक्षेञ तुळजापूरात येवु नये यासाठी मोबाईल ध्दारे संपर्क साधावा असे आवाहन यावेळी केले.
कोरोना प्रार्दुभाव वाढू नये म्हणून आम्ही यंदा भाविकांनी घरीच साधेपणाने शारदीयनवराञोत्सव साजरा करावा तिर्थक्षेञ तुळजापूर ला येवु नये असे आवाहन शेवटी केले
0 Comments