मुंबई : मुंबईतील धारावीला कोरोनाचा विळखा बसला आहे. आतापर्यंत इथे कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या ही ४७ वर पोहोचली आहे. सोमवारी सकाळी धारावीत ४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे धारावीत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ही ५ वर पोहोचली आहे अशी माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.
तर रविवारी दिवसाअखेरपर्यंत राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १९८२ वर पोहचली. सध्या राज्यात १६१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत २१७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

No comments:
Post a Comment