कळंब शहरातील अवैध धंदे बंद करा ,खुले आम मटका विक्री चे आज आनोखे आंदोलन !
कळंब / शहरामध्ये अवैध धंद्याला ऊत आला असून शहरामध्ये अराजकता माजली आहे कळंब शहरातील शिवाजी चौकात आंबेडकर चौक बस स्टँड आशा अनेक ठिकाणी मटका, जुगार व गुटखा हे राजरोसपणे विक्री हि पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने चालू आहे वरील ठिकाणे हि वर्दळीची असून यामध्ये विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी ,महिला यांना रस्त्याने जाताना त्रास होत आहे छेडछाडीच्या प्रकरणात वाढ झाली असून महिलांना त्रास होत आहे त्यामुळे शरीरातील शांतता भंग पावल्याचे दिसत आहे गुटख्याची खुलेआम विक्री जोमात चालू आहे लाखो रुपयांची उलाढाल यामधून होत असून तरूण पिढी व्यसनाधीन होत आहे या सर्व अवैध रित्या चालू असलेल्या गुटखा, मटका, जुगार बंद करण्यात यावे असे निवेदन पोलिस अधीक्षक उस्मानाबाद यांना व पोलिस उपविभागीय अधिकारी कळंब यांच्या मार्फत 31 जानेवारी रोजी देवून देखील कसल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसून रिपब्लिकन सेनेच्या वतीने आज दि 15 रोजी खुलेआम मटका विक्रीचे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात येणार असून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते आपण आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा प्रमुख रिपब्लिकन सेना उस्मानाबाद अनिल हजारे व लाखन गायकवाड अॅड. आबासाहेब पायाळ, राकेश कोमटवार यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे .तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी कळंब शहरासह शिराढोण व येरमाळा येथे पोलिस ठाणे कार्यरत आहेत.एवढी मोठी व्यवस्था कार्यरत असतांनाही या पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात अवैध वाहतूकीसह बेकायदेशीर दारू विक्री,मटका आदी अवैध धंद्यांनी उच्छाद मांडला आहे.कळंब शहरासह तालुक्यातील विविध गावात असे चीत्र असतांना व याची छळ सामान्य नागरिकांना पोहचत असतांनाही पोलिस यंत्रणा मात्र शांत असल्याचे दिसून येत आहे.कळंब तालुक्यात कळंब शहरासह 95 गावे आहेत.यापैकी शिराढोण,खामसवाडी,ईटकूर,मोहा, येरमळा,मंगरूळ,मस्सा,नायगाव ही लोकसंख्येने व आकाराने मोठी असलेली गावे तालुक्यात आहेत.या सर्व गावासह शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुर्वी कळंब येथे एकच पोलिस ठाणे कार्यरत होते.तालुक्याचा विस्तार,वाढलेली लोकसंख्या याचा विचार करून मध्यंतरी येरमळा व शिराढोण येथे स्वतंत्र पोलिस ठाणे कार्यरत झाले आहे. कळंब शहरासह लगतच्या 26 गावांचा कळंब पोलिस ठाण्यात समावेश करून उर्वरित गावे भौगोलिक सलगता पाहून येरमाळा व शिराढोण ठाण्यास जोडलेली आहेत.पोलिस ठाण्याची संख्या वाढल्याने या पोलिस ठाण्यात आकृतीबंधानुसार कर्मचाऱ्यांची संख्याही वाढली आहे.यास्थितीत पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध झाले असले तरी तालुक्यातील या तिन्ही पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सर्व काही अलबेल चालले आहे असे चीत्र मूळीच दिसून येत नाही. कळंब पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात कळंब शहरासह इटकूर,मोहा,मस्सा ही मोठी गावे तर शिराढोण पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात शिराढोण,खामसवाडी,मंगरूळ,लोहटा प आदी मोठी गावे येतात.याशिवाय येरमाळा ठाण्याच्या कार्यक्षेत्रात दहिफळ,चोराखळी,वाघोली आदी मोठी गावे येतात.या गावासह ठाणे असलेल्या मुख्यालयाच्या ठिकाणीही गत अनेक दिवसापासून अवैध धंद्यानी उच्छाद मांडला आहे.गुन्ह्यांचे प्रमाण वाढतच असतांना अवैध वाहतूक,मटका,अवैध दारू असे अनेक अवैध धंदे खुलेआम व जोमात सुरू आहेत.तालुक्यात.तीन पोलिस ठाणे व मोठा फौजफाटा कार्यरत असतांनाही हे सर्व सुरूच कसे राहते असा प्रश्न यामुळे निर्मान होतो. राजरोस अवैध धंदे कळंब शहरासह तालुक्यातील इटकूर,मोहा, खामसवाडी,मंगरूळ,शिराढोण,येरमा ळा आदी भागात अवैध वाहतूक जोमात सुरू आहे.शहरातील काही प्रमूख चौकात भररस्त्यावर पँसेजर पॉइंट झाले आहेत. यापैकी काही गावातील मुख्य रस्त्यावर व चौकात खुलेआम अवैध दारू विक्री केली जाते. मंगरूळ,खामसवाडी,इटकूर येथे तर याचा कहर झाला आहे.यामुळे सामान्यजन हैराण झाले आहेत.मटका चालवणारे अनेक एजंट गावोगावी कार्यरत आहेत.तालुक्यातील कळंब,शिराढोण व येरमाळा या तिन्ही पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात वाढलेले अवैध धंदे संतापजनक असे आहेत.मर्जीतील कर्मचारी ठाण्यातच ठाण मांडून तालुक्यातील कळंब,येरमळा व शिराढोण या तीनही पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचार्याच्या मध्यंतरी बदल्या झाल्या होत्या.यावेळी आपली बदली झाली असतांनाही काही कर्मचारी आपले बस्तान बसलेल्या ठाण्यातील जागा सोडण्यास तयार नाहीत.कळंब,शिराढोण पोलिस ठाण्यातही असो काही ठाण मांडून बसलेले काही मर्जीतले कर्मचारी आहेत.त्यांची बदली झाली असतांनाही ठाण्याचे प्रमूख त्यांना का सोडत नाही? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. वरिष्टांनी लक्ष देण्याची गरज येथील अवैध वाहतूक व दारू,मटका यावर पायबंद घालण्यासह चोर्या,घरफोड्यासारख्या गुन्ह्याची उकल का होत नाही याकडे लक्ष देण्याची गरज निर्मान झाली आहे.तालुक्यातील अनेक गावात अवैध धंद्यामुळे सामान्य नागरिक परेशान आहेत. मात्र या लोकांशी लढा देण्यास कोणी पुढे येत नसल्याने हा आवाज आतल्या आत दबला जात आहे.यामुळे.वरिष्टांनी येथील कारभाराकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
0 Comments