Hot Posts

6/recent/ticker-posts

सदाशिव खोत ! तुम्ही कडकनाथ बाधीत शेतकर्यांसाठी लढा का उभारत नाही ?


सदाशिव खोत ! तुम्ही कडकनाथ बाधीत शेतकर्यांसाठी लढा का उभारत नाही ?




परवा कोल्हापुर जिल्ह्यात कडकनाथ घोटाऴ्यात फसलेल्या एका शेतकरी बांधवाने आत्महत्या केली. अजून अनेक शेतकरी नैराश्याच्या खाईत आहेत. अनेक जण ढसाढसा रडताहेत. अनेकांनी जमवलेली आयुष्याची पुंजी काहीतरी करण्याच्या अपेक्षेने कडकनाथ प्रकल्पासाठी लावली आणि ही माणसं रस्त्यावर आली. कडकनाथमध्ये हजारो शेतकरी फसले आहेत. बरबाद झाले आहेत. अनेक शेतकर्यांच्या लेकी-बाऴींचे विवाह अडचणीत आले आहेत. गावा-गावात प्रचंड रोष आहे या फसलेल्या शेतकर्यांच्या मनात. अन्यायाविरूध्दची आग खदखदते आहे. या घोटाऴ्यात होरपऴलेल्या लोकांची यात चरफड होतेय. अशा स्थितीत कृषीमंत्री राहिलेल्या सदाशिव खोतांच्या काऴजात कऴ का येत नाही ? त्यांचे काऴीज का पिऴवटून निघत नाही ? ते आज सत्तेत नाहीत. हा घोटाऴा त्यांनी आणि त्यांच्या चिरंजीवानेच केलाय असा समज तमाम शेतकर्यांच्यात आहे. यातले सत्य काय आणि असत्य काय आहे ? ते तपासात बाहेर येईलच. रयत अँग्रोचे सर्व संचालक खोतांच्या अगलेत व बगलेत होते. सागर खोत या चांडाऴ चौकडीबरोबर फिरत होते. सदाशिव खोत या प्रकरणात आमचा काही संबंध नसल्याचे सांगत आहेत. त्यांचा संबंध आहे की नाही ते समजेलच पण घोटाऴेखोर खोतांच्या वलयाचा वापर करत होते. खोतांना याची नैतिक जबाबदारी घ्यावीच लागेल. रयत अँग्रोवाली हरामी पिलावऴ सागर खोतांना घेवूनच मिरवत होती. खोतांच्या तोंडाला खरकटं लागले असल्याचे शेतकरी बोलतायत. दिवसेंदिवस कडकनाथचा भडकनाथ होताना दिसतो आहे.  कडकनाथ घोटाऴा झाला तेव्हा सदाशिव खोत सत्तेच्या झगमगाटात होते. आज त्यांचा सत्तेचा जिरीटोप उतरला आहे. त्यांनी त्यावेऴी सदर प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी केली होती. त्या चौकशीचे काय झाले ? तपास कुठवर आलाय ? याचा काही थांगपत्ता नाही. तोवर आरोपी जामिनावर सुटले आहेत. उजऴ माथ्याने फिरू लागले आहेत. सदर आरोपींच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करायला हवा. परवाच्या कडकनाथ घोटाऴा बाधीत शेतकर्याच्या आत्महत्येला हेच जबाबदार आहेत. त्यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. हा प्रकार समोर आला तेव्हा खोतांच्या संघटणेशी संबंधीत लोक शेतकर्यांच्यावर अरेरावी करत होते. जर सदाशिव खोत या गटारघाणीत बरबटले नाहीत तर त्यांनी कडकनाथ घोटाऴ्याप्रकरणी आवाज उठवायला हवा. सर्व बाधित शेतकरी संघटीत करून शेतकर्यांना न्याय मिऴवून द्यायला हवा. कडकनाथ घोटाऴ्यात बाधीत झालेल्या शेतकर्यांसाठी सदाशिव खोत का काय बोलत नाहीत ? का त्यांच्यासाठी एखादे आंदोलन उभारत नाहीत ? "एक दुधवाला ते मंत्री" त्यांचा हा प्रवास शेतकर्यांच्याच जीवावर झाला. आज तोच शेतकरी आत्महत्या करू लागला आहे. त्याचे जीवन उध्वस्त होवू लागले आहे. अशावेऴी सदाशिव खोतांनी शेतकर्यांचा एल्गार पुकारला पाहिजे. ते जर निर्दोष आहेत तर का शेतकर्यांसाठी पुढे येत नाहीत ? घोटाऴ्यात अडकलेल्या शेतकर्यांसाठी सदाशिव खोतांच्या काऴजात का कऴ उठत नाही ? असा प्रश्न या निमित्ताने पडल्याशिवाय रहात नाही. शेतकर्यांचा नेता म्हणून नावारूपाला आलेले सदाशिव खोत मंत्री झाले ते शेतकर्यांच्या ताकदीवरच. आज कडकनाथ घोटाऴ्यात हजारो शेतकरी पुरता फसला आहे. त्याची वाट लागली आहे. अनेक शेतकरी फोन करून रडताहेत. या फसलेल्या शेतकर्याला दिलासा आणि आधार देण्याची गरज आहे. शेतकर्यांच्या जीवावर स्वत:चे वैभव उभारणार्या खोतांनी शेतकर्यांचे लुटलेले वैभव परत मिऴवून देण्यासाठी काय केले ? या शेतकर्यांना न्याय नाही मिऴाला तर शेतकरी कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाहीत. सगऴेच शेतकरी जीव देणारे नाहीत. काही संतापलेले, सर्वस्व गमावलेले शेतकरी जीव घ्यायच्याही मानसिकतेत आहेत. "आम्ही त्या हरामखोरांना सोडणार नाही !" असे  संतप्त शेतकरी बोलत आहेत. "आम्ही मरूच पण त्या भडव्यांना मारून मरू !" असा संताप ते व्यक्त करत आहेत. त्यामुऴे प्रशासनानेही याबाबत लवकरात लवकर ठोस पाऊलं उचलायला हवीत. तपास अधिक वेगाने व्हायला हवा. या घोटाऴ्यातला एकही आरोपी सुटता कामा नये. मग तो कितीही मोठा असो किंवा कुण्याच्याही बुडाखालचा असो त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. त्यांच्या हरामखोरीचे शासन त्यांना झालेच पाहिजे. फसलेल्या शेतकर्यांची पै ना पै परत मिऴायला हवी.

Reactions

Post a Comment

0 Comments