संवेदना
गोठली : देशातील पहिला गुन्हा पंढरपुरात दाखल!
सोलापूर
: रोजच्या आहारातील सर्वात महत्वपूर्ण घटक आणि पोषक आहार समजलं जाणारं दूध काही
नराधमांनी विष बनवून टाकलं आहे. संवेदना गोठवणारी घटना पंढरपुरात घडली असून
देशातील अशा प्रकारचा पहिलाच गुन्हा पंढरपुरात दाखल झाला असावा अशी माहिती अन्न व
औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त प्रदीप राऊत यांनी दिली. शुक्रवारी गोपनीय
माहिती मिळाल्याने तालुक्यातील सुगाव भोसे येथील एका दूध केंद्रावर अधिकाऱ्यांनी
छापा टाकला आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. अधिकाऱ्यांना छाप्यात
मेलामाईनचा साठा सापडला. आणि बघता बघता राज्यातील अन्न व औषध प्रशासन सह पोलीस
खाते हादरून गेले.आज राज्य पातळीवरील अधिकारी पंढरपुरात डेरेदाखल झाले. विशेष म्हणजे या मेलामाईन पदार्थाला संपूर्ण भारतात बंदी आहे.
इराणहून याची आयात कशी झाली, कोणी मागवले याचा शोध युद्धपातळीवर सुरू झाला आहे. यामागे
खूप मोठे रॅकेट असणार आहे .लवकरच हे उघडकीस येईल अशी चर्चा परिसरात मोठ्या
प्रमाणावर सुरू आहे.
*अशा प्रकारे उघड झाला
प्रकार..*
शुक्रवारी रात्री सदर डेअरीचा मालक दत्तात्रय महादेव जाधव उर्फ
डॉक्टर,वय ४० वर्षे,रा.सुगाव भोसे,ता. पंढरपूर व त्याचा नोकर व सहकारी गणेश हरी गवळी वय २० वर्षे
हा कृत्रिम दूध बनवत असल्याचे आढळले.या ठिकाणी ५१ कि. मेलामाईन, ६३८ लिटर भेसळयुक्त
कृत्रिम दूध , २९८ किलो दूध पावडर,
कि.व्हे परमीट पावडर ,लॅक्टोज पावडर,पॅराफिन २९८ किलो असा
एकूण ४०२०१२ किंमतीचा साठा जप्त करण्यात आला होता. भेसळयुक्त दूध जागेवरच नष्ट
करण्यात आले होते. सदर भेसळीचे दूध तिरूमाला डेअरी,भोसे व वल्लभ डेअरी आजोटी ता. पंढरपूर येथे देण्यात येत होते.
पदार्थांचे पुरवठादार, आरोपी व पुरवठादार यांची सांगड घालणारा तिरूमाला डेअरीचा
पंढरपूर येथील केमिस्ट गोरख धांडे व तपासात निष्पन्न होत असलेले इतर आरोपी यांचे
विरूद्ध भारतीय दंड संहिता कलम १८८,२७२,२७३,३२८ व अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ५९ अंतर्गत
गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अशी माहिती दिली आहे.
*मेलामाईन पाण्यात
टाकल्यावर दुधासारखे दिसते.*
श्रीराम दूध केंद्राचा चालक डॉ.जाधव हा आपल्या सहकाऱ्याच्या
मदतीने हे कृत्य करत असे.तो स्वत: जनावरांचा डॉक्टर असल्याने त्याला भेसळयुक्त दूध
कसे बनवायचे याचे तांत्रिक ज्ञान असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याचे राऊत यांनी
सांगितले.
*मेलामाईन*
मेलामाईन हे कार्बन, हायड्रोजन आणि नायट्रोजनचा फॉर्म्युला
आहे. या तिन्हींचे मिश्रण तयार केल्यावर साइनामाईड या विषारी द्रव्याप्रमाणे हे
काम करते. पण नायट्रोजनचे प्रमाण ६७ टक्के केल्यावर प्लास्टिक साहित्य निर्मितीस
याचा उपयोग होतो. शोभेचे प्लास्टिक काम, फोम, बोर्ड, भांडी यासाठी या प्लास्टिकचा वापर
शक्य आहे. पण फॉर्म्युल्यापासून बनविलेली पावडर खाद्यपदार्थात वापरली जाते. या
पावडरला मेलामाईन असे संबोधले जाते. याच्या वापराने मानवाच्या किडनी, त्वचा व डोळ्यांवर
विपरीत परिणाम होतात. त्यामुळे मेलामाईनच्या वापरास भारतात बंदी असल्याचे अन्न व
औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त प्रदीप राऊत यांनी सांगितले.
*इराण मधून तस्करीचं जाळे*
इराण या आखाती देशातून मेलामाईनचं तस्करीचे जाळे पसरले आहे
.सीमारक्षक आणि अन्न व औषध प्रशासनाची करडी नजर असताना हा पदार्थ सोलापुरातील
पंढरपूरपर्यंत कसा पोहोचला, या प्रश्नांची उकल लवकरच होईल असं अधिकाऱ्यांनी सांगितले. सदर
संशयित आरोपींना मे.न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली होती.त्यानंतर आता पंधरा
दिवसांसाठी मे.न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
0 Comments