शरद पवारांची पक्ष सोडलेल्यांवर टीका ..शरद पवारांच्या भाषणातील ठळक मुद्दे...
माझ्या राजकारणाची सुरुवात सोलापूर जिल्ह्यापासून झाली-
- १९६५ साली राज्यातील तरुणांचे नेतृत्त्व माझ्याकडे होते. तेव्हा सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी माझाकडे होती.
- सोलापूर जिल्हा यशवंतराव चव्हाणांच्या विचारावर चालणारा जिल्हा आहे.
- सोलापूर जिल्ह्याचा इतिहास
मोहिते पाटील, दिलीप सोपलांवर नाव न घेता टीका.
- स्वाभिमानी जिल्ह्यात लाचारी स्विकारणाऱ्या नेत्याला लोक जागा दाखवतात.
- गेलेल्या लोकांचे नाव कशाला काढता.
- गेलेले नेते इतिहास जमा होणार आहेत.
- गेलेल्याची चर्चा बंद करा येणाऱ्याची चर्चा करा.
- भलत्याच्या दारात जाण्याची सुभेदारी ज्यांनी घेतली त्यांना जनता जागा दाखवेल.
- विधानसभेनंतर महाराष्ट्राचे चित्र वेगळे असेल.
- संयुक्त महाराष्ट्र चळवळीवेळी फक्त सोलापूर जिल्ह्यात कॉंग्रेस विजयी झाली होती.
- यश कशासाठी? सबंध राज्य आणि देशात वेगळे चित्र आहे.
- सोलापूर जिल्हा कामगारांचा, शेतकऱ्यांचा जिल्हा होता.
- शेतकरी आत्महत्या केल्यानंतर कुटुंबातील लोकांची अवस्था काय होत असेल?
- आजचे राज्यकर्ते काय करतात?
अमित शहांवर पवारांची टीका :
- शरद पवार बर वाईट केले म्हणून कधी तुरुंगात गेला नव्हता.
- तुरुंगात गेलेल्यानी सांगू नये की शरद पवारांनी काय केले?
- सोलापूरच्या सभेत अमित शहा म्हणाले होते, शरद पवारांनी काय केले?
- शरद पवारांनी सांगितला किल्लारी भुकंपाचा प्रसंग.
- मुख्यमंत्री असताना सकाळी ७ वा किल्लारीत होतो.
- आजचे राज्यकर्ते पुराचा दौरा हेलिकॉप्टरने दौरा करतात आणि अर्धा तासात गायब होतात.
- राज्याच्या प्रमुखाने आपत्तीच्या ठिकाणी मुक्कामी करुन राहावे लागते कारण त्याशिवाय यंत्रणा हालत नाही.
- मी काय म्हातारा झालो? अजून लय जणांना घरी पाठवायचेय.
- ते कशाच्या जोरावर पाठवायचे? येथे उपस्थित तरुणाईच्या जोरावर पाठवायचेय.
- मला काही लोकांच्याकडे बघायचय.
0 Comments