श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वर्धापनदिनाची भव्य पालखी व रथ मिरवणुकीने सांगता
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, सद्गुरू...! श्री स्वामी समर्थ महाराज की...!, श्री अन्नपूर्णा माता की जय...! च्या जय घोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली व मान्यवरांच्या उपस्थितीत श्री स्वामी समर्थांच्या पादुका पालखी आणि न्यासाच्या सुशोभित रथाच्या भव्य मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला. या मिरवणुकीत दिंड्या, वाद्यांच्या गजरात, स्वरांजली बँडपथक लालबाग मुंबई, विजुभाई तांडेल, चुनाभट्टी यांचे आराध्य ढोलपथक, नादब्रह्म, पुणे यांचा ढोल-ताशा ध्वज पथकांच्या तालात व अमोलराजे भोसले लेझीम संघाच्या शानदार खेळाने, केरळ येथील ढोल पथक, संभळ, ब्यांड सह श्री हनुमान देखावा, कोल्हापूर व अक्कलकोट येथील हलगी पथक, पारंपारिक वाद्याला प्राधान्य देत, फटाक्यांची अतिषबाजी व रिमझिम पावसाच्या सरी झेलत पालखी सोहळा संपन्न झाला. गुरुपौर्णिमा उत्सव व मंडळाचा ३९ वा. वर्धापनदिन मोठ्या उत्साहात मिरवणूकीने सांगता बुधवारी करण्यात आली.
दरम्यान भरत मित्र मंडळ पुणे अध्यक्ष व न्यासाचे क्रियाशील सभासद बाळासाहेब दाभेकर, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य शहाजीराजे पवार, सो.म.पा. नगरसेवक व शिवसेना जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे, सो.म.पा. माजी उपमहापौर दिलीप (भाऊ) कोल्हे, सो.म.पा. नगरसेवक, मा.स्थायी समितीचे माजी चेअरमन व शहर-जिल्हाध्यक्ष (कॉंग्रेस) चेतन नरोटे, सो.म.पा. स्थायी समिती सभापती रंजीताताई चाकोते, आराध्य तांडेल चुनाभट्टी मुंबई, सागर पिसे, सोलापूर, पुणे नगरसेवक संदीप खर्डीकर, उद्योजक श्री रेघे मुंबई यांच्या हस्ते पालखी व रथ मिरवणुकीचा शुभारंभ यांच्या हस्ते पालखी व रथ मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात करण्यात आला.
रथाची व पालखी मिरवणूक श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या प्रांगणातून निघून नवी विहीर, राजे फत्तेसिंह चौक, सर्जेराव जाधव पथ मार्गे, समर्थ चौक, सेंट्रल चौक, सोन्या मारुती, वीर सावरकर चौक, कापड लाईन मार्गे कारंजा चौक, बुधवार पेठेतील समाधी मठ, तेथील आरतीनंतर कारंजा चौक, सुभाष गल्ली, जय जवान गल्ली, मधला मारुती, राम गल्ली, गुरु मंदिर, भारत गल्ली, देशमुख गल्ली मार्गे अन्नछत्र मंडळात आरतीने सांगता करण्यात आली.
या भव्य-दिव्य पालखी सोहळ्याचे नेटके व अचूक नियोजन अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अध्यक्ष व संयोजक अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. रथ व पालखीला नयनरम्य फुलांनी सजविण्यात आले होते. मिरवणूक प्रसंगी विविध सामाजिक संघटनेकडून पालखी मार्गावर प्रसाद वाटप करण्यात आले.याबरोबरच स्वागत कमानी, डिजिटल ब्यानर लावण्यात आले होते. मिरवणूक बघण्यासाठी पालखी मार्गावर दुतर्फा प्रचंड गर्दी झालेली होती.
याप्रसंगी न्यासाचे श्री व सौ. श्रीकांत घाटगे, सोलापूर, उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, संदीप फुगे, कु. हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले, कु. समर्थ संदीप फुगे, राजेंद्र लिंबीतोटे, लक्ष्मण पाटील, संतोष भोसले, रामचंद्रराव घाटगे, लाला राठोड, सौरभ मोरे, मनोज निकम, सिद्धेश्वर मोरे, समीर लोंढे, प्रविण देशमुख, डॉ.विनायक बुधले, अरविंद शिंदे, गणेश भोसले, प्रा.शरणप्पा अचलेर, अभियंता किरण पाटील, आरतीताई लिंगायत, श्रीकांत झिपरे, शिवराज स्वामी, वैभव मोरे, संजय गोंडाळ, निखिल पाटील, अतिश पवार, प्रवीण घाडगे, गोटू माने, किरण जाधव, रोहन शिर्के, योगेश पवार, सिद्धाराम टाके, सोमशेखर जमशेट्टी, बालाजी पाटील, सिद्धेश्वर माळी, अप्पा हंचाटे, अश्पाक काझी, मैनुद्दीन कोरबु, दत्ता माने, दत्ता मोरे, शुभम सावंत, मुन्ना कोल्हे, बसवराज क्यार, बाळासाहेब पोळ, स्वामिनाथ गुरव, गोरख माळी सतीश महिंद्रकर, नामा भोसले, शहाजीबापू यादव, कल्याण देशमुख, चंद्रकांत हिबारे, प्रा. मनोज जगताप, प्रदीप जाधव, धानप्पा उमदी, सिध्दाराम कल्याणी, एस.के.स्वामी, राजेंद्र पवार, बाळासाहेब घाडगे, योगेश पवार, सागर शिंदे, अजय अडवीतोटे, संतोष पत्तरगे, राम शिंदे, विशाल चांदले, मुकेश ठाकूर, सागर घाटगे, समीर खेर, विकास पवार, विशाल कलबुर्गी, गोविंदराव शिंदे, पिंटू साठे, कुणाल भालेकर, सुमित कल्याणी, महेश देवलकर, महेश कुलकर्णी, विराज माणिकशेट्टी, महादेव अनगले, राजेंद्र पवार, मल्लिकार्जुन बिराजदार, दत्ता माने, श्रीनिवास गवंडी, प्रसाद हुल्ले, रमेश हेगडे, अनिल बिराजदार, शरद भोसले, महांतेश स्वामी, असद फुलारी, रमेश हळसंगी, समर्थ घाटगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठल रेड्डी, समर्थ चव्हाण, ऋषी लोणारी, काशिनाथ वाले, सुराज्य घाटगे, श्रीशैल कुंभार, ज्ञानेश्वर भोसले, किरण साठे, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
पालखी व रथाचे विधिवत पूजा न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पु पुजारी, विश्वसंभर पुजारी व संजय कुलकर्णी, सोमकांत कुलकर्णी यांनी केले. सचिव शामराव मोरे यांनी आभार मानले.
लक्षवेधी मिरवणूक :-
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली निघालेली पालखी व रथ मिरवणुकीसाठी न्यासाने उत्कृष्ट नियोजन केलेले होते. या सोहळ्यास परराज्य, परदेशांतून स्वामी भक्त उपस्थित होते. पालखी व रथ मिरवणुकीत वाद्य वृन्दांची लावलेले क्रम व अमोलराजे लेझीम संघाचा बहारदार खेळ, मिरवणुकीची केलेली मांडणी व पालखीचे भक्तगणांतून कौतुक होत होते. इंव्हेट बाबत अन्नछत्र मंडळाचे उत्कृष्ट नियोजन पाहण्यासाठी राज्यातील अन्य तीर्थ क्षेत्रातील आवर्जून तेथील मंडळीनी या अन्नछत्र मंडळाच्या ३९ व्या वर्धापन दिन व गुरुपौर्णिमा उत्सवास भेटी दिल्या.
न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
.png)
No comments:
Post a Comment