गॅस टंचाई, महागाईवरून ठाकरे आक्रमक; सरकारवर गंभीर आरोप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 17, 2026

गॅस टंचाई, महागाईवरून ठाकरे आक्रमक; सरकारवर गंभीर आरोप

 गॅस टंचाई, महागाईवरून ठाकरे आक्रमक; सरकारवर गंभीर आरोप

मुंबई(कटूसत्य वृत्त):- Uddhav Thackeray यांनी राज्यातील गॅस टंचाई, महागाई आणि धर्मांतरविरोधी विधेयक यांसारख्या विविध मुद्द्यांवरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली. जनतेच्या व्यथा नाकारणारे मुख्यमंत्री राज्यासाठी दुर्दैवी असल्याचेही त्यांनी स्पष्टपणे म्हटले.

सोमवारी त्यांनी Rahul Narwekar यांची विधिमंडळात भेट घेतली. या भेटीत दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेत्यांची लवकर नियुक्ती करण्याची मागणी करत त्यांनी स्मरणपत्र सादर केले.

भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री गॅसचा तुटवडा नसल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षात सर्वसामान्य नागरिकांना रांगेत उभे राहावे लागत आहे. “जर जनतेचे दुःख सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचत नसेल, तर सरकारी यंत्रणा अत्यंत गलथान किंवा सदोष आहे,” अशी टीका त्यांनी केली.

गॅस टंचाईविरोधात केवळ शिवसेनेनेच आंदोलन का करावे, असा सवाल उपस्थित करत त्यांनी जनतेलाही आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. शिवसेना नेहमीच जनतेच्या हक्कांसाठी लढत आली असून पुढेही लढत राहील, असे त्यांनी सांगितले. तसेच जागतिक परिस्थितीमुळे वाढलेल्या महागाईबाबत पंतप्रधानांनी देशाला कधी संबोधित करणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

धर्मांतरविरोधी विधेयकावर भूमिका

धर्मांतरविरोधी विधेयकाबाबत बोलताना ठाकरे यांनी सांगितले की, जबरदस्तीने, आमिष दाखवून किंवा असहायतेचा फायदा घेऊन होणाऱ्या धर्मांतराला त्यांचा ठाम विरोध आहे आणि अशा विधेयकाला ते पाठिंबा देतात. मात्र, “५० खोके” सारख्या राजकीय आमिषांद्वारे होणाऱ्या धर्मांतरालाही विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही वर्षांत धर्मांतराच्या घटना वाढल्याचा उल्लेख विधेयकात करण्यात आला असून, हे राज्य आणि केंद्रातील सत्ताधारी सरकारचे अपयश असल्याचा आरोपही त्यांनी केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages