Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळ तालुक्यात ओढे, नाले 'ओव्हर फ्लो' शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटला

 मोहोळ तालुक्यात ओढे, नाले 'ओव्हर फ्लो' शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटला



मोहोळ (कटूसत्य वृत्त):-दरवर्षी मे महिन्यात पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहात आणि पाण्यासाठी धावपळ करावी लागणाऱ्या मोहोळ तालुक्यासह जिल्ह्यात यंदा पावसाच्या इतिहासात पहिल्यांदाच कृतिका नक्षत्राचा दमदार पाऊस झाला. परिणामी ओढे, नाले तुडूंब भरले असून तालुक्यातील भीमा, सीना,भोगावती व नागझरी नद्यांना पाणी आले आहे.यावर्षी उन्हाळा जसा कडक होता, तशीच पावसाळ्यालाही दमदार सुरुवात झाली आहे. हा मान्सूनपूर्व पाऊस असला तरी न भूतो न भविष्यती असा पाऊस मे महिन्याच्या १३ तारखेपासून सुरू झाला, तो २३ मेपर्यंत म्हणजे १० दिवस या पावसाने धुमाकूळ घातला होता. गेल्या दोन दिवसांपासून श्रावण सरी बरसल्यासारखा रिपरिप पडत आहे. तर कधी उसंत घेत आहे. गेल्या दहा, बारा दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे शेतांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शेताच्या ताली पाण्याने गच्च भरल्या असून ओढे-नाले वाहत आहेत. यामुळे खरीप  शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला दरवर्षी रोहिणी नक्षत्रातही पाऊस नीट पडत नसल्याने आभाळाकडे डोळे लावून बसावे लागते. पावसाअभावी पेरण्या लांबतात. शेतातील उन्हाळी पिके, फळबागा पाण्याअभावी करपू लागतात. हिरवा चारा टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने दूध उत्पादनावर परिणाम होतो, मात्र यावर्षी पहिल्यांदाच कृतिका नक्षत्रात अवकाळीसह मान्सूनपूर्व पावसाने दहा दिवस दमदार हजेरी लावली आहे. यामुळे नदी-नाल्यांना पाणी आल्याने शेतीसह
पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटला आहे.पूर्ण मशागती पूर्णपणे थांबल्या आहेत. शेतात
तण गवत वाढले आहे. मात्र चिखलामुळेआणि पाण्यामुळे ते काढता येत नाही. त्यामुळे
बळीराजा हतबल झाला आहे.मान्सूनपूर्व पावसाने १० ते १२ दिवस दमदार हजेरी लावल्याने शेतातील तालींमध्ये पाणी साठले आहे. त्यामुळे शेतांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. उन्हाळी पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यातच मान्सून नियोजित वेळेअगोदर ८ दिवस अगोदरच दाखल झाला असून तो शेजारील कर्नाटक राज्याच्या उंबरठ्यावर आहे. मान्सूनचा
पाऊस जर या वातावरणात सुरू झाला तर खरिपाच्या पेरण्यांसाठी मातीला वाफसा होणे
अवघड होऊन बसणार आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या लांबण्याची चिंता शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.मोहोळ शहरासह तालुकावासी मार्च व एप्रिल महिन्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे गेले. या टंचाईमुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच शेत पिकांचेही पाण्याअभावी नुकसान झाले.मोहोळमध्ये तर काही भागात टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. आता दमदार पाऊस झाल्याने हा टंचाईचा काळ आता संपला आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments