Hot Posts

6/recent/ticker-posts

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य प्रेरणादायी - समीर गायकवाड

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य प्रेरणादायी - समीर गायकवाड




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य प्रेरणादायी आहे.  असे मत साहित्यिक  समीर गायकवाड यांनी व्यक्त केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जयंती निमीत्त  साहित्यिक  समीर गायकवाड यांचे राजमाता आहिल्यादेवी होळकर आणि त्यांचा जीवन प्रवास या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करणेत आले होते.
जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहात घेणेत आलेले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थांनी सिईओ कुलदीप जंगम हे होते.

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद सोलापूरच्या वतीने दिनांक 30 मे 2025 रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात साजरी करण्यांत आली . मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या शुभहस्ते प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करणेत आले. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर , उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव,  मुख्य लेखा व वित्त अधिकारी मनिषा वाकडे, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता नरेंद्र  खराडे, लेखाधिकारी पाटील, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव  प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे, लेखाधिकारी श्रीकांत मिरगळे, प्रकाश शेंडगे,रणजीत घोडके, अमित सलगर, सुहास चेळेकर , शंकर बंडगर, सचिन घोडके,संतोष जाधव,रविद्र करजगी उपस्थित होते.
         
पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे सामाजिक व धार्मिक कार्य दिशादर्शक - गायकवाड

राजे मल्हारराव होळकर यांनी अहिल्यादेवींना मुलगा मानले. त्यांना सती जाणे पासून प्रवृत्त केले. त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांना प्रेरणा मिळून विविध सामाजिक कार्ये केली. समाजातील अनेक वाईट प्रथा त्यांनी बंद केल्या. १७६५ मध्ये मल्हारराव यांचे निधन झाले. त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या खचल्या नाहीत. एखादी स्त्री किती दुरदृष्ट्रीची असते याचा प्रत्यय अहिल्यादेवी यांचे कर्तृत्व पाहून समजते. अहिल्यादेवी यांचे आवाहनास साद देत चोरांचा बंदोबस्त करणारे व्यक्तीस मुलीचे लग्न लावून देणार असे आवाहन केले. या आवाहनास साद देत यशवंतराव फणसे यांनी चोराचा बंदोबस्त केला. त्यांनी फणसे यांना स्वत ची मुलगी दिली.  पुण्यश्लेक अहिल्यादेवी यांचे समोर नातेवाईक महिला सती गेल्या. आज समाजात छोट्याशा घटनेवरून माणसे विचलीत होतात. मात्र त्यावेळी अहिल्यादेवी विचलीत झाले नाहीत. या सर्व बाबी लक्षात घेता. त्या कालावधीत रक्तातील कर्तबगार माणसे मरण पावली तरी त्या खचल्या नाहीत.असेही साहित्यीक समीर गायकवाड यांनी सांगून राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि त्यांचा जीवन प्रवास या विषयावर विविध प्रसंग सांगितले. महेश्वर चा घाट ब्रिटीश कालीन बांधकामा पेक्षाही चांगला आहे. विविध घाट व जिर्णोध्दाराची कामे केली. अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या नावाचा कुठे उल्लेख केलेला नाही. अहिल्यादेवी यांनी नावा साठी काम केले नाही. आज काहीही काम न केलेली माणसे चमकोगिरी करत असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.
 या कार्यक्रमासाठी ओम बुरसे, गणेश साळुंखे, गणेश कलुबर्मे, श्रीमती राजश्री रोजी, श्रीम स्मिता पोरेडी, योगेश म्हमाणे, किरण निमसे, प्रविण चव्हाण, विनायक कदम, एम जे कलादगी यांनी परिश्रम घेतले. कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांनी आभार मानले.
Reactions

Post a Comment

0 Comments