अवकाळीसह मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा
मोहोळ तालुक्यात पिके पाण्यात; शेतीचे मोठे नुकसान
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- कायम दुष्काळी छायेत असलेल्या सोलापूर जिल्ह्याला ऐन उन्हाळ्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाळ्याचा अनुभव येत आहे. मोहोळ तालुक्यासह सर्व ११ तालुक्यांत अगोदर अवकाळीचा आणि आता मान्सूनपूर्व पावसाचा जोरदार तडाखा बसत आहे. परिणामी, लाख मोलाची पिके पाण्यात गेल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मागील १५ दिवसांपासून व गेल्या चार, पाच दिवसांपासून तालुक्यातील पापरी, आष्टी, शेटफळ, तेलंगवाडी, सिद्धेवाडी, घोडश्वर (बेगमपूर), अरबळी, मिरी, येणकी, वाघोली, परमेश्वर पिंपरी, कामती, कुरुल, सय्यद वरवडे, अंकोली, टाकळी सिकंदर, पाटकूल, पेनूर तसेच तालुक्याच्या पूर्व भागातील सावळेश्वर, पोफळी, गोटवाडी, रामहिंगणी, वडवळ, लांबोटी, शिरापूर, आष्टी,भांबेवाडी, हिंगणी (नि), नरखेड, देगाव, वाळूज, मनगोळी, भैरववाडी, एकूरके, यल्लमवाडी, मसले चौधरी, डिकसळ, भोयरे, घाटणे, मलिकपेठ परिसराला वादळी वाऱ्यासह आलेल्या जोरदार ४०५ एकरावरील पिकांचे नुकसान गेल्या आठवड्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने मोहोळ तालुक्यातील पापरी,खंडाळी, येवती, आष्टी व तेलंगवाडी या पाच गावातील अंदाजे १६२ हेक्टरवरील (४०५ एकरावरील) पिकांचे व फळबागांचे नुकसान
झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली.अवकाळी आणि मान्सूनपूर्व पावसाने अक्षरशः
झोडपून काढले. जोरदार वाऱ्यामुळे पापरी परिसरातील तसेच तालुक्यातील केळी, आंबा या
फळबागांसह उन्हाळी पिके भूईसपाट होऊन कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. सोमवारी दुपारी अडीच वाजता झालेल्या मुसळधार पावसामुळे बेगमपूर येथील प्रयोगशील व प्रगतशील शेतकरी बालाजी लोहकरे यांच्या शेतातील हाता-तोंडाशी आलेले दोन एकर क्षेत्रावरील खरबूजाच्या पिकात पोटरी-गुडघ्या एवढे पाणी साठल्याने सगळी मेहनत पाण्यात गेली आहे. या दोन एकरावरील खरबूजाच्या प्लॉटसाठी त्यांनी बियाणे,लागवड, खते, फवारणी आदी कामांसाठी दीड लाख खर्च केला होता. खरबूज खूप चांगले आले होते. हे पीक हाती आले असते तर या खरबूजापासून त्यांना अंदाजे सहा-साडेसहा लाख रुपये उत्पन्न मिळाले असते. मात्र, गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून मुक्काम ठोकून असलेल्या अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेले खरबुजाचे पीक पाण्यात गेले आहे.नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आल्याचे कृषी
विभागाकडून सांगण्यात आले.
चौकट
" अवकाळी पावसाचा फटका शेती
आणि शेतकऱ्यांना बसला आहे. कृषी व महसूल विभाग यांच्या वतीने प्रत्यक्ष नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बाधित क्षेत्रावर जाऊन पंचनामे करण्यात येत आहेत. कृषी सहायक, गावकामगार तलाठी यांच्याकडून नुकसानीचा प्राथमिक व नजरअंदाज घेतला आहे.नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत.
अतुल पवार, तालुका कृषी अधिकारी
0 Comments