Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची जबाबदारी महानगरपालिकेसहित नागरिकांची देखील - अतिरिक्त आयुक्त पवार

 सोलापूर शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची जबाबदारी महानगरपालिकेसहित नागरिकांची देखील - अतिरिक्त आयुक्त पवार




सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका आणि नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे शहराला स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्या नेतृत्वाखाली २ डिसेंबर ते १७ डिसेंबर दरम्यान राबविण्यात आलेला स्वच्छता पंधरवडा सोलापूरकरांसाठी आदर्श ठरला आहे.

या मोहिमेच्या माध्यमातून शहरातील डिवायडर, मोकळी मैदाने, आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ व चकाचक करण्यात आली. विशेष म्हणजे, बांधकाम साहित्य व आजोरा सार्वजनिक रस्त्यावर टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी दिली आहे.
*सोलापुरातील रस्त्यांची साफसफाई आणि हद्दवाढ भागातील मोहिमेचा विस्तार*
सोलापुरात एकूण १४० रस्ते आहेत, यापैकी ८९ रस्त्यांची सध्या साफसफाई सुरू आहे. उर्वरित रस्त्यांची साफसफाई तातडीने करण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी सांगितले. तसेच, सोलापूर महानगरपालिका हद्दवाढ भागातही मोठ्या प्रमाणावर ही स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे.
*स्वच्छतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न*
स्वच्छता मोहिम फक्त पंधरवड्यापुरती मर्यादित न ठेवता, ती संपूर्ण वर्षभर राबवली जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर स्वच्छतेच्या या मोहिमेत नागरिकांनीही सहभागी होऊन, स्वतःहून स्वच्छता राखण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे टाळणे, रस्त्यांवर बांधकाम साहित्य न ठेवणे, आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी महानगरपालिकेच्या नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे पवार साहेबांनी सांगितले.
*नागरिकांची नैतिक जबाबदारी*
शहर स्वच्छ व सुंदर ठेवणे ही फक्त महानगरपालिकेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे. स्वच्छता राखल्यामुळे शहराचे सौंदर्य वाढते तसेच आरोग्यदृष्ट्याही हे महत्त्वाचे ठरते.
*स्वच्छतेचा मूलमंत्र: स्वच्छ सोलापूर – सुंदर सोलापूर*
स्वच्छ सोलापूर मोहिमेचा मूळ उद्देश शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेची सवय रुजवणे आहे. बांधकाम साहित्य व रस्त्यावर फेकले जाणारे आजोरा यामुळे वाहतूक अडथळा निर्माण होतो आणि पर्यावरणावरही परिणाम होतो. त्यामुळे अशा प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी महानगरपालिकेने कठोर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
सोलापूर शहराला स्वच्छ, सुंदर, आणि आरोग्यदायी बनविण्याचा निर्धार सर्वांनीच केला पाहिजे, असे आवाहन ह्यावेळी करण्यात आला. "स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर" हा मूलमंत्र स्वीकारून सोलापूर शहराला आदर्श शहर बनवण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करण्याचे आवाहन ह्यावेळी सोलापूर विकास मंचच्या वतीने करण्यात आला.
*सोलापूर विकास मंचतर्फे सत्कार*
महानगरपालिकेच्या या उत्कृष्ट कार्याबद्दल सोलापूर विकास मंचने अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांचे अभिनंदन व आभार व्यक्त करण्यासाठी सत्कार केला. यावेळी मंचाचे विजय कुंदन जाधव, मिलिंद भोसले, अॅड. दत्तात्रय अंबुरे, आनंद पाटील, इक्बाल हुंडेकरी, गणेश शिलेदार, आणि रेवण आयगोळे हे सदस्य उपस्थित होते. सत्कार स्वीकारताना अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी मंचाचे आभार मानत, स्वच्छतेसाठी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली आणि शहराला अधिक सुंदर आणि स्वच्छ ठेवण्यासाठी महानगरपालिका आणि नागरिकांच्या सहकार्याचा विश्वास व्यक्त केला.


Reactions

Post a Comment

0 Comments