हुकूमशाहीच्या विरोधात मतदान केल्याने विजय
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- मोहोळ मतदारसंघातील अनेक नेते व कारखानदार विरोधात होते,
परंतु सर्वसामान्य जनता ही माझ्या बाजूने होती. सर्वसामान्य मतदारांनी मतदारसंघातील दादागिरी व हुकूमशाहीच्या विरोधात मतदान केल्यानेच माझा विजय झाला असल्याचे मत नूतन आमदार राजू
खरे यांनी व्यक्त केले.उत्तर सोलापूर शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने गुळवंची येथे सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर दीपक गायकवाड, बापूसाहेब शिंदे, बाळासाहेब गायकवाड, महादेव गोडसे, संजय पौळ, हणमंत भोसले, महेश पांढरे, पांडुरंग नवगिरे, प्रकाश राठोड, संजय खरटमल, उत्तर सोलापूर शिवसेनेच्यावतीने आमदार खरे यांचा सत्कार मा. नाभाऊ खरे साहेब तात्या कादे उपस्थित मतदारसंघात आमदार नसताना होते. १९९० खरे म्हणाले, सालापासून शिवसेनाचा कार्यकर्ता म्हणून काम केले असून बाळासाहेबांच्या शिकवणीनुसार समाजकारणावर जास्त भर दिला आहे. उत्तर सोलापूरसह मोहोळ १०० कोटी रुपयांची कामे केली आहेत. ऐन दुष्काळात नागरिकांना पाण्याच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला. अनेक गावात बोअर पाडून पाण्याची व्यवस्था केली. यापुढेही मतदारसंघात निधीची कमतरता भासणार नाही. तालुक्याचा सर्वतोपरी विकास केला जाईल,असे सांगितले. उत्तर सोलापूर शिवसेनेच्यावतीने आ. खरे यांचा सत्कार केला.विविध गावचे शिवसैनिक,महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.jpg)
No comments:
Post a Comment