शहर उत्तर' मध्ये शोभा बनशेट्टी यांची बंडखोरीने भाजपचा सुपडासाफ होणार..? - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, November 5, 2024

शहर उत्तर' मध्ये शोभा बनशेट्टी यांची बंडखोरीने भाजपचा सुपडासाफ होणार..?

शहर उत्तर' मध्ये शोभा बनशेट्टी यांची बंडखोरीने

भाजपचा सुपडासाफ होणार..?


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे भाजपाचे विद्यमान आमदार आणि माजी मंत्री विजयकुमार देशमुख यांच्या विजयाचा मार्ग खडतर बनला असल्याने भाजपचा सुपडासाफ होणार..? अशी चर्चा शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात जोरात सुरु आहे. अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी अर्थात ४ नोव्हेंबर रोजी या मतदार संघातून २६ पैकी ६ उमेदवारांनी आपापले अर्ज माघार घेतले आहे. त्यामुळे २० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

गेली ३ टर्म विजयकुमार देशमुख यांनी या मतदारसंघावर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात २० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात माजी महापौर महेश कोठे यांनी यापुर्वीही निवडणूक लढविली होती. मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. यंदा महेश कोठे यांनी 'महाविकास आघाडी'कडून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने तगडे आव्हान उभे केले आहे. त्यातच 'भाजपा'च्याच माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी विजयकुमार देशमुख महेश कोठे शोभा बनशेट्टी यांच्या विरोधात बंड पुकारले आहे.

या मतदारसंघात २० उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी 'भाजपा'चे विजयकुमार देशमुख, 'राष्ट्रवादी'चे महेश कोठे आणि 'अपक्ष' शोभा बनशेट्टी असा तिरंगी सामना रंगणार आहे. माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्या कन्या तथा माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी खरंच मनावर घेवून ही निवडणूक लढविली तर विजयकुमार देशमुख यांना फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे. शिंदे गटाला २५ नगरसेवक; बनशेट्टींचे ठाम आणि श्रेष्ठींचा नाईलाज शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून मताची विभागणी टाळण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला किमान २५ जागा देण्यासंदर्भा 'भाजपा'कडून आश्वासन मिळाले आहे. त्यामुळे शिंदे यांनी माघार घेतल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे माजी महापौर शोभा बनशेट्टी यांना माघार घेण्यास्तव कसोशीने प्रयत्न करण्यात आले. मात्र आपण रिंगणात राहणारच असे ठाम मत त्यांनी व्यक्त केल्याने 'भाजपा' श्रेष्ठींचा नाईलाज झाल्याची चर्चा रंगली आहे. २६ पैकी ६ उमेदवारांची माघार शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अमाले शिंदे यांनी स्वराज्य पक्षाकडून या मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र त्यांनी ऐनवेळी आपला अर्ज माघार घेतले. तसेच 'काँग्रेस'चे सुनील रसाळे, प्रकाश वाले, हिंदू महासभेचे संजय साळुंखे आणि अपक्ष अमरनाथ बिराजदार यांनीही माघार घेतली. या मतदार संघातून एकूण २६ जणांनी उमेदवारी अर्ज भरले होते. त्यापैकी ६ जणांनी माघार घेतल्याने २० उमेदवार रिंगणात आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages