भारताच्या पुरातन वारशाचं जतन करण्याचं काम अभिजात भाषा करतात : प्रा.डॉ. राजेंद्र खंदारे
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- भाषा ही दैनंदिन वापरामध्ये किती प्रमाणात आहे आणि दुसरं म्हणजे तिच्यात चिरंतन, ललित आणि शास्त्रीय साहित्याची निर्मिती किती होते, यावर त्या भाषेची समृद्धी अवलंबून असते. सर्वसामान्य माणसांच्या बोलीमधूनच भाषा जिवंत राहते." आपलं ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करण्याकरिता व भारताच्या पुरातन वारशाचं जतन करण्याचं काम अभिजात भाषा करतात असे मत सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. राजेंद्र खंदारे यांनी व्यक्त केले.
0 Comments