आता थंडीची चाहूल हळूहळू लागणार! ऑक्टोबर अखेर पावस
पुणे (कटूसत्य वृत्त):- सध्या राज्यात सुरू असलेला पाऊस आता विश्रांती घेणार असून, या मॉन्सूनची सांगता ऑक्टोबर अखेर होणार आहे. तसेच 'ला-निना' अजूनही दृष्टीपथात नाही, त्यामुळे लगेच थंडीची चाहूल महाराष्ट्रात लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती सेवानिवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
येत्या आठवड्याभरात नाशिक, जालना, संभाजीनगर, जळगांव, बुलढाणा, अमरावती, अकोला ह्या भागात थंडीला सुरवात होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. दक्षिण महाराष्ट्रातील जिल्ह्यात मात्र ह्या आठवड्यात लगेच थंडी जाणवणार नाही. एक नोव्हेंबर नंतर मात्र संपूर्ण महाराष्ट्रात हळूहळू थंडीत वाढ होऊ शकते. जोपर्यंत 'ला- निना' अवतरत नाही तोपर्यंत ऑक्टोबर व नोव्हेंबर मध्ये थंडीची ही स्थिती कायमच टिकून राहू शकते. 'ला- निना' च्या हजेरीनंतर होणाऱ्या वातावरणीय बदलानुसार थंडीचे चढ-उतार, त्या-त्या वेळी नक्कीच स्पष्ट करता येतील.
.png)
No comments:
Post a Comment