शांतता रॅली मनोज जरांगे यांचे बारा वाजता होणार आगमन

पोवाड्याच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष देखील सादर होणार
छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर तेथून ते रॅलीने छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करणार आहेत. त्यानंतर तेथेच उभारण्यात आलेल्या भव्य व्यासपीठावरून ते मराठा समाज बांधवांना संबोधीत करणार आहेत.
दरम्यान सकाळपासून जरांगे पाटील यांचे आगमन होईपर्यंत शिवशाहीर यांची तोफ धडाडणार आहे .छत्रपती शिवाजी महाराज चौकात अरविंद घोगरे हे शिवशाहीर विविध पोवाड्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज, तसेच मराठ्यांचा इतिहास सादर करणार आहेत. याशिवाय मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षाची कहाणीही ते ऐकवणार आहेत. तसेच छत्रपती संभाजी महाराज चौकात सकाळच्या सत्रामध्ये सोलापूरचे तरुण शिवशाहीर ... यांचे पोवाडे ऐकायला मिळणार आहेत.
सभेनंतर जरांगे पाटील हे आपल्या निवडक समर्थकांसह पार्क चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि अहिल्यादेवी होळकर आदी महामानवांना अभिवादन करणार आहेत. सोलापूरचे चार हुतात्मे या महामानवांना अभिवादन देखील करणार आहेत ही शांतता रॅली यशस्वी करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे अमोल शिंदे , दास शेळके, अनंत जाधव, रवी मोहिते , श्रीकांत घाडगे , शेखर फंड , विजय पोखरकर , महेश सावंत , बाळासाहेब गायकवाड , दिलीप कोल्हे परिश्रम घेत आहेत.
0 Comments