वारकऱ्यांसाठी राबवली जाणार पेन्शन योजना, लाखो वारकऱ्यांना होणार मोठा फायदा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 16, 2024

वारकऱ्यांसाठी राबवली जाणार पेन्शन योजना, लाखो वारकऱ्यांना होणार मोठा फायदा

 वारकऱ्यांसाठी राबवली जाणार पेन्शन योजना, लाखो वारकऱ्यांना होणार मोठा फायदा 


मुंबई (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा लाभलेली आहे. सध्या आषाढी वारी सुरू असून यानिमित्ताने लाखो भाविक विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जात असतात. अशातच राज्य सरकारने वारकऱ्यांसाठी पेन्शन योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. परंपरेनं महिनाभर वारी करणाऱ्या वारकऱ्यांना वृद्धपकाळात राज्य सरकारकडून पेन्शन दिली जाणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय हा मुख्यमंत्री वारकरी महामंडळाच्या वतीने जारी करण्यात आला आहे.


मुख्यमंत्री वारकरी महामंडळाची स्थापना
पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांसाठी आणि कीर्तनकारांसाठी कल्याणकारी योजना राबण्यासाठी 'मुख्यमंत्री वारकरी महामंडळ' स्थापन करण्याचा निर्णय रविवार ( 14 जुलै) रोजी घेण्यात आला. या महामंडळाच्या माध्यमातून वारकऱ्यांना सोयी सुविधा पुरवल्या जाणार आहेत. तसेच वारकऱ्यांच्या प्रश्नांचे निराकरण केले जाणार आहे. प्रशासकीय सेवेतील अधिकारी आणि निवृत्त अधिकारी यांची महामंडळ व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. या महामंडळासाठी 50 कोटी रुपयांचे भांडवल देण्यात येणार आहे. या महामंडळाचे मुख्यालय पंढरपूरमध्ये असणार आहे.
मुख्यमंत्री वारकरी महामंडळाच्या महत्वाच्या योजना
1) राज्यातील सर्व पालखी मार्गांचे सुधारणा, सुधारणा , स्वच्छता, आरोग्य, निवारा यांच्यासाठी दरवर्षी आर्थिक तरतूद करून नियोजन केले जाणार.
2)आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी सुरक्षा आणि विमा सुरक्षा कवच देण्यात येणार.
3) वारकरी मंडळाला भजन आणि कीर्तन साहित्य जसे की टाळ,मृदुंग, वीणा खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाणार.
4) कीर्तनकारांसाठी मानधन सन्मान योजना आणि आरोग्य विमा योजना राबवली जाणार.
5) इंद्रायणी, चंद्रभागा, गोदावरी व इतर नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी उपाययोजना राबवणार .
6) पंढरपूर, देहू, आळंदी , मुक्ताईनगर , सासवड, पिंपळनेर, त्र्यंबकेश्वर, पैठण, कोल्हापूर संस्थान, शेगाव, भगवानगढ, अगस्तीऋषी, संत सावता माळी समाज मंदिर अरण (तालुका माढा जिल्हा सोलापूर) व इतरही तीर्थक्षेत्रांचा विकास या महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

दरम्यान, राज्य सरकारच्या या योजनेचा राज्यातील लाखो वारकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages