सोलापूर जिल्ह्यातून साडेपाच लाख मराठा मुंबईला जाणार जिल्ह्यातील
प्रत्येक तालुक्यामध्ये मीटिंग चर्चा बैठका होणार .
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- 20 जानेवारीला मुंबईकडे जाण्याचे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे याचाच भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये व प्रमुख शहरांमध्ये मराठा समाजातील बंधू व भगिनी यांच्याशी चर्चा विनिमय करण्यासाठी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये मराठा जागृती केली जाणार आहे यासाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील प्रमुख समन्वयक मंडळी यांच्याशी चर्चा करून मुंबईला महाराष्ट्र त सर्वात जास्त मराठा बांधव सोलापूर जिल्ह्यातूनच जाण्याचे नियोजन सोलापूर जिल्हा मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने चालू आहे यासाठी प्रत्येक तालुक्यातील प्रमुखांची संपर्क साधून नियोजन केले जाणार आहे .