Hot Posts

6/recent/ticker-posts

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंढरपूर येथील महाआरोग्य शिबाराला भेट*

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंढरपूर येथील महाआरोग्य शिबाराला 




 पंढरपूर(कटूसत्वृत्त):- सरकारच्यावतीने सामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत असून त्यांना जीवनात आरोग्याची चिंता वाटू नयेत्यांचा आरोग्यावरचा खर्च कमी व्हावा याकरीता आरोग्याविषयक पायाभूत सुविधा उभारण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेत्याचाच एक भाग म्हणून महाआरोग्य शिबाराचे आयोजन करण्यात आले आहेअसे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

        ६५ एकर परिसर येथे कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने आयोजित महाआरोग्य शिबाराला दिलेल्या भेटीप्रसंगी ते बोलत होतेयावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटीलआरोग्य  कुटुंब कल्याण मंत्री प्राडॉतानाजी सावंतखासदार जयसिद्धेश्वर महास्वामीआमदार समाधान आवताडेराजेंद्र राऊतजिल्हाधिकारी कुमार आशीर्वादजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळेआरोग्य सेवा उपसंचालक डॉराधाकिसन पवारभैरवनाथ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्राशिवाजी सावंत आदी उपस्थित होते.

 

*आरोग्याविषयक पायाभूत सुविधा उभारण्यावर भर*

 

          फडणवीस म्हणालेआरोग्यविषयक पायाभूत सुविधा उभारण्याकरीता  हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत१४ वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती करण्यात आली आहेआता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची व्यवस्था करीत आहोत. 'माता सुरक्षित तर घर सुरक्षितअभियानांतर्गत राज्यातील दोन ते अडीच लाख गृहभेटी देऊन महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आलीमहिलांना आजार होऊच नये याकरीता प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

 

*सामान्य नागरिकांना  लाखापर्यंत मोफत उपचार*

 

            प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत नागरिकांवर  लाखापर्यंतचे मोफत उपचार करण्यात येत आहेतत्याच धर्तीवर राज्यातही महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा विस्तार करुनकुठलीही अट  ठेवता राज्यातील नागरिकांनाही  लाखापर्यंतचे मोफत उपचार देण्याचा निर्णय घेण्यात आलाआरोग्यविभागाच्यावतीने'आरोग्याचअधिकार'(राईट टू हेल्थकायदा तयार करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेहा कायदा तयार झाल्यानंतर सामान्य नागरिकाला कायदेशीररित्या आरोग्य सेवा देणे बंधनकारक होईल.

 

*महाआरोग्य शिबाराचा सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ*

 

         आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूर येथे लाखो भाविक येत असतातत्यांना आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्याचे आरोग्य मंत्री डॉतानाजी सावंत आणि त्यांचे बंधू प्राशिवाजी सावंत यांनी महाआरोग्य शिबीर आयोजित करण्याचा धाडशी निर्णय घेतलासदरचे महाशिबीर पार पडल्यानंतर एक 'महारेकॉर्डतयार झालात्यामध्ये सुमारे ११ लाख रुग्णांनी विविध तपासण्या करत उपचार प्राप्त करुन घेतलेज्या रुग्णांना पुढचे उपचार आवश्यक होतेत्यांच्यावर पुढील उपचार करण्यात आलेकार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त आयोजित या महाशिबारात आजपर्यंत सुमारे ४२ हजार रुग्णांनी लाभ घेतलागरजू रुग्णांवर उपचार देण्यासाठी ही व्यवस्था उभारण्यात आली असून याचा रुग्णांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहेअसेही उपमुख्यमंत्री श्रीफडणवीस म्हणाले.

 

*कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त आयोजित महाआरोग्य शिबीराचे लाभ घेण्याचे

 सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांचे आवाहन*

 

         आषाढी एकादशी  कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त येणाऱ्या राज्यातील वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी अतिशय कमी कालावधीत महाआरोग्य शिबाराचे आयोजन करण्यात आले आहे.  आषाढी एकादशी यात्रेनिमित आयोजित महाआरोग्य शिबीरात ११ लाख ५० हजार रुग्णांची तपासणी करुन उपचार करण्यात आलेया ठिकाणी तपासणीअंती गंभीर आजार असलेल्या रुग्णांवर पुढील योग्य ते उपचार राज्य शासनाच्या दवाखान्यात  मोफत करण्यात येत आहेत.

         या महाशिबारात अतिदक्षता विभागआपला दवाखाना तीनची निर्मितीपरिसरात १२ प्राथमिक आरोग्य केंद्र६० सुसज्ज रुग्णवाहिका हजार ९०० कर्मचारीरुग्णाचे नियोजन करण्यासाठी वार रुम कार्यान्वित करण्यात आली आहे.  वारकऱ्यांना महाआरोग्य शिबाराच्या माध्यमातून आरोग्य विभागाच्या सेवा एकाच छताखाली मोफत उपलब्ध करुन देण्यासाठी २२२३  २४ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहेअधिकाधिक वारकऱ्यांनी या शिबीराचे लाभ घेण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉसावंत यांनी केले.    


         राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत २२ महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेतमोफत उपचार संकल्पनेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते जिल्हा रुग्णालयापर्यंत रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येत आहेतबाह्य   अंर्तरुग्ण विभागात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढलेली आहेत्यामुळे रुग्णांचा आत्मविश्वास वाढला आहे.

 

       देशाचे प्रधानमंत्री यांनी देशाची अर्थव्यवस्था  ट्रिलियन डॉलर करण्याचा संकल्प केला असून त्यानुसार राज्याची अर्थव्यवस्था  ट्रिलियन  डॉलरवर नेण्याकरीता राज्यातील जनतेचे आरोग्य सदृढ असले पाहिजेत्यादृष्टीने येत्या अधिवेशनात 'राईट टू हेल्थविधेयक मांडण्याच्या मानस केला आहेयेत्या काळात राज्याचे आरोग्य खाते देशात क्रमांक एकवर नेऊअसा संकल्प डॉसावंत यांनी केला

Reactions

Post a Comment

0 Comments