जिल्ह्यात जागतिक हात धुवा दिवस साजरा; हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जागतिक हात धुवा दिनाच्या निमित्ताने आज १६ आक्टोंबर रोजी जिल्हयातील सर्व शाळा, अंगणवाडी व ग्रामपंचायतीमधून जागतिक हात धुवा दिवस साजरा करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी दिली. आज हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन हात धुणे दिवस साजरा केला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांचे मार्गदर्शना खाली ही मोहिम पार पडली.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अभियानांतर्गत राबविण्यात येणा-या स्वच्छतेच्या विविध कार्यक्रमांपैकी वैयक्तिक स्वच्छतेसाठी हात धुणे हा एक महत्वाचा भाग आहे. जनतेच्या स्वच्छतेविषयी जाणीवा समृध्द होवून सदृढ, निरोगी व आनंददायी जीवनासाठी जागतिक स्तरावर १५ ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी जागतिक हातधुवा दिन म्हणून साजरा केला जातो. त्याअनुषंगाने १५ आॅक्टोबर रोजी रविवार आलेमुळे सर्व शाळा व अंगणवाडी यांना सुट्टी असलेमुळे दि. १६ आॅक्टोबर रोजी जिल्हयातील सर्व शाळा , अंगणवाडी , पंचायत समिती व ग्रामपंचायतीमधून जागतिक हात धुवा दिन साजरा करण्यात आला आहे. पंचायत समिती अक्कलकोट येथे गटविकास अधिकारी सचिन खुडे, दक्षिण सोलापूर पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ, मंगळवेढा पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी शिवाजीराव पाटील, यांनी स्वत हून पंचायत समिती कर्मचारी व अधिकारी यांना प्रात्यक्षिक करून हात धुणेचे महत्व सांगितले. पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर शाळा , ग्रामपंचायत व अंगणवाडी तसेच करकंब जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळकरवस्ती बार्डी केंद्र पांढरेवाडी येथे आज हातधुवा दिन साजरा करत हात स्वच्छ का धुवावेत त्यांचे महत्त्व मुलांना सांगून स्वच्छतेचे संदेश सांगितले. बार्शी येथील नारी प्राथमिक शाळा, तावशी येथीस प्राथमिक शाळेत हॅन्ड वाॅश स्टेशन उभारणेत आले होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेळगांव आर येथे जागतिक हात धुवा दिन साजरा करण्यात आला. यावेळी हात धुण्याचे फायदे, हात कसा धुवावा..का धुवावा याचे सविस्तर महत्त्व स्वच्छता मार्गदर्शक रंगनाथ काकडे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवस्ती (पिरळे), ता. माळशिरस या प्रमुख शाळा मध्ये मोठ्या उत्साहात हात धुवा दिन साजरा करणेत आला. करमाळा तालुक्यात गट समन्वयक उमेश येळवणे यांनी
हातधुवा दिनाच्या संकल्पनेला धरुन अन्न स्वच्छता, हात धुण्याच्या महत्वाच्या वेळा विशेषतः स्वयंपाक करण्यापूर्वी, स्वयंपाक झाल्यावर, शौचाहून आल्यावर, जेवणापूर्वी, बाळाला भरविण्यापूर्वी, लहान बाळाची शी धुतल्यानंतर, झाडझुड केल्यानंतर, पाळीव प्राणीमात्रांना स्पर्श केल्यानंतर, आजारी व्यक्तीच्या भेटी पूर्वी व नंतर, बाहेर खेळून, फिरुन आल्यानंतर साबणाने हात धुणे आवश्यक आहे.या संदर्भात ग्रामीण भागातील लोकशिक्षण घडवून आणण्यासाठी गावातील सर्व सार्वजनिक ठिकाणी हात धुण्याचे प्रात्यक्षिक करुन दाखविण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातील शाळा अंगणवाडी सह ग्रामपंचायतीनी चांगल्या पद्धतीने हात धुवा दिनाबाबत जनजागृती करणेत आली होती. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना हात स्वच्छ धुण्याचे महत्त्व सांगताना हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. हात धुण्याचे फायदे तोटे सांगितल्यास वर्तन बदलास मदत होणार असल्याचे सांगून शालेय विद्यार्थ्यांसोबत हात धुण्याचे महत्त्व व त्यांचा आरोग्यास होणारा लाभ याबाबत चर्चा व संवाद करणेत आला.
0 Comments