*लालमहाल ते वढू तुळापुर व्हाया... नागपुर अधिवेशन*
“... यांची पुस्तके भाजप जाळायचं धाडस दाखवणार का? ”
“ म्हणुन अजित पवार टार्गेट असतात...”
खरं पाहिले तर अजित पवारांना भाजपने व त्यांच्या लावारिस भक्तांनी टार्गेट का केले याचा इतिहास आहे. दादोजी कोंडदेव छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू आहेत की नाही यावर राज्यात गोंधळ निर्माण झाला. डाँ जयसिंगराव पवार मा. म देशमुख पत्रकार संपादक न्यानेश महाराव डाँ आ. ह. साळुंखे या जेष्ट इतिहासकारांनी इतिहासाचे पुरावे देत स्पष्ट केले की दादोजी कोंडदेव हे गुरू नाहीत . त्यानंतर अजित पवार हे सत्तेत होते. त्यांच्या सरकारने पुण्यातील लाल महालात दादोजी कोंडदेव यांचा पुतळा काढला . याचा सनातन प्रतिगामी संघटना व भाजपाच्या मनात राग होता . ती आग भाजपाच्या मनात अद्याप धगधगत आहे. तसेच मागिल दिड दोन वर्षापुर्वी अजित पवारांनी अर्थसंकल्पात छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळाच्या सुशोभीकरणाला म्हणजेच वढू तुळापुरला तब्बल 250 कोटी रुपऐ निधीची तरतुद केली. विकासआराखड्याला मंजुरी दिली. याच जागेवरुन अनेकांनी दंगली पेटवण्याचे कारस्थान रचली होती. त्या जाग्यावर आत्ता आपले काही चालणार नाही हे ज्यांच्या लक्षात आले अशा एकबोटे पण नितांत खोटे बोलण्याऱ्यांना वढु तुळापुर मधील संभाजीराजेंच्या समाधी स्थळाचा विकास पाहावत नव्हता. वढु तुळापूर मधुन आपले वर्चस्व कमी होईल ही शंका एकबोेंटेंच्या मनात होती. मग काय वरुन आदेश आला की करा अजित पवारांना टार्गेट... ज्या संभाजी महाराजांनी सनातनी ब्राम्हणी धर्माला झिडकारले अन महाराष्ट्रधर्म वाढवला होता. त्या संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचा जिर्णोधार होत आहे हे आत्ताच्या सनातन रक्षकांना कसे पचनी पडणार होते. तोही अजित पवारांवर राग होताच. पण त्यापेक्षाही अधिक म्हणजे जनतेने निवडुन दिलेले प्रतिनिधी ज्या सभागृहात काम करतात असे लोकशाहीचे सर्वोच्च मंदिरात अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांना धर्माच्या चौकटीत अडकवु नका म्हणणे अन स्वराज्यरक्षक म्हणणे हे पचले नाही. संभाजी महाराजांचा सभागृहात केलेला सन्मान हा रेकाँर्डवर राहणार होता. ते रेकाँर्डवर राहु नये म्हणुन भाजपाने नाचायला सुरवात केली. पण माघार घेतील ते पवार कसले. ... अजित जे बोलले ते सन्मानपुर्वकच आहे असाही सुर इतिहासकार व पुरोगामी संघटनांनी काढला . संभाजी ब्रिगेड ने थेट समर्थनार्थ भुमिका घेतली.
लाल महालापासुन ते वढु तूळापुरच्या 250 कोटी रुपयांच्या विकासातुन व्हाया नागपुर अधिवेशनात अजित पवार टार्गेट होण्याचा इतिहास आहे. शेवटी सांगायचो विसरुनच गेलो की पहाटेचा शफथविधी करुन 72 तासात अंघोळ करुन कपडे स्वच्छ धुवुन घेतेलेलं प्रकरण सुध्दा भाजपवाले आजही विसरलेले नाहीत म्हणुन देखील अजित पवार नेहमीच भाजपाच्या निशाण्यावर राहतात. पण निशाण्यावर जखमी होतील ते अजित पवार कसले... द्या बत्ती तोफांना...
हर्षल बागल
प्रवक्ते, संभाजी ब्रिगेड
0 Comments