रत्नाई कृषी महाविद्यालयाचे डॉ.योगेशदत्त तुकाराम जाधव ठरले युवाप्रताप राज्य पुरस्काराचे मानकरी

अकलूज (कटूसत्य वृत्त):- कृषी क्षेत्रातील अत्यंत मानाचा असा युवाप्रताप राज्यस्तरीय कृषी व सामाजिक पुरस्कार सोहळा बालगंधर्व रंगमंदिर डेक्कन,पुणे येथे महेश कडूस पाटील,अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर संघटने मार्फत दर दोन वर्षांनी आयोजित केला जातो.या कार्यक्रमाचे उद्घाटन राधाकृष्ण विखे पाटील,प्रमुख पाहुणे प्रताप पाटील चिखलीकर होते आणि पारितोषिक वितरण हरिहर कौसडीकर,संचालक महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद,नामदेव ढाके व मुरलीधर मोहोळ यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
ह्या राज्य पुरस्कार सोहळ्याचे वैशिष्ट म्हणजे कृषी क्षेत्राशी संलग्न अशा विविध विभागांमध्ये ज्यांनी उत्कृष्ट व उल्लेखनीय काम केले आहे अशा एकूण 12 विभागातील व्यक्तींची निवड केली जाते.यातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा कृषी शिक्षण संशोधन व सेवा या विभागाचा मानाचा पुरस्कार रत्नाई कृषी महाविद्यालयातील अकलूजच्या रत्नाई कृषी महाविद्यालयाचे कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.योगेशदत्त तुकाराम जाधव यांचे कृषी शिक्षण व संशोधन क्षेत्रामध्ये मागील १८ वर्षाच्या योगदानाबद्दल त्यांना प्रदान करण्यात आला.त्यांच्या नावे एकूण दोन पुस्तके,दोन पुस्तिका,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशित २८ शोध निबंध, २३ रेडिओ टॉक,एक आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन व विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी दिशादर्शक ठरेल असे अनेक प्रेरक कार्यशाळा त्यांनी आयोजित केलेल्या आहेत.त्यांच्या या वैविध्यपूर्ण अशा कार्यासाठी त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
हा प्रतिष्ठित राज्य पुरस्कार मिळाल्याबद्दल सहकार महर्षी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील,शिक्षण प्रसारक प्रसारक मंडळाचे नूतन अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील,संचालिका कु.स्वरुपाराणी मोहिते पाटील, संस्थेचे सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील, स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य, प्राचार्य व सर्व प्राध्यापक वृंद्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment